शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मोडनिंब आडत बाजारातून दररोज सात ट्रक बोरं परराज्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:22 IST

मोडनिंब : मोडनिंब बाजारातून सध्या बोरांची आवक वाढली असून, दरही वधारला आहे. या बाजार समितीततून दररोज सात ट्रक बोरं ...

मोडनिंब : मोडनिंब बाजारातून सध्या बोरांची आवक वाढली असून, दरही वधारला आहे. या बाजार समितीततून दररोज सात ट्रक बोरं महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये विक्रीसाठी जात आहेत.

काही दिवसांपूर्वी बोरांना भाव नसल्यामुळे उत्पादकांना मोठा फटका बसला. बाजारात सुरुवातीला वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो शेतकऱ्यांना दर मिळाला. मात्र यंदाच्या वर्षी तीन ते पाच रुपये प्रति किलो दर मिळाला. शेतकरी अडचणीत सापडला होता. अनेक शेतकऱ्यांनी झाडाखाली पडलेली बोरं विक्रीसाठी बाजारात न आणता शेतातच टाकून दिली. त्यामुळे नुकसान झाले. त्यातच आणखी भर पडली ती थंडीची. मागील महिन्यात थंडी कमी होती. ढगाळ वातावरण होते. त्यामुळे झाडावरील बोरं गळाली. ही बोरं वेचणीचा खर्च, लागणारा बारदाना, वाहतूक हे परवडले नाही. अशा काळात बोरं उत्पादकांनी त्याकडे पाठ फिरवली. ज्या शेतकऱ्यांनी छाटणी केली होती. त्यांच्या झाडांना उशिरा बोरं लागली. आता ही बोरेे बाजार समितीतीत येत आहेत. १५ रुपये किलो दर मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र यापूर्वी ढगाळ वातावरण व घसरलेला दर यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.