शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

उजनीतून भीमापात्रात सात हजार क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि.  24 - उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे. यामुळे रविवारी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे पाणी पंढरपूर बंधाºयात पोहोचणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.
उजनी धरणातून बुधवारी भीमा नदीपात्रात सुरूवातीला १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. गुरूवारी यामध्ये १५०० क्युसेक्सची वाढ केली. तर रविवारी दुपारी १ वाजता पुन्हा चार हजार क्युसेक्स पाण्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून वाहत आहे.
बुधवारी व गुरूवारी सोडलेल्या ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मीरे बंधा-यात शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचला आहे. पुन्हा सोडलेला ४००० क्युसेक्सचा विसर्ग अद्याप पुढील ३१०० क्युसेक्स पाण्याच्या विसर्गापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र रविवारी सकाळपर्यंत दोन्ही पाण्याचा विसर्ग एक होऊन रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत हा ७१०० क्युसेसचा विसर्ग पंढरपूर बंधाºयात पोहोचेल, असे सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुका हद्दीतील भीमा नदी पात्रात अवैध वाळूचोरीमुळे मोठे खड्डे पडले आहेत. ३ फूटापासून ५ फूटापर्यंतचे खड्डे नदीपात्रात असल्याने पाणी वाळूत मोठ्या प्रमाणात मुरत आहे. शिवाय हे खड्डे भरून पाणी पुढे सरकण्यासाठी वेळही लागत आहे. रविवारी सकाळी पिराची कुरोलीत पाणी येईल. मात्र तिथून पुढे किमान ८ तास पंढरपूर बंधाºयात हे पाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत. खेडभोसे, व्होळे, कौठाळी, करोळे, कान्हापूरी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाळू उपसा केल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे.
 
पाण्याचा विसर्ग शनिवारी दुपारी १ वाजता वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढेल. भीमा नदी पात्रात ब-याच गावच्या शेतकºयांनी विद्युतपंप बसविले आहेत, ते काढून घ्यावेत. शिवाय चंद्रभागा वाळवंटात पडलेले खड्डेही प्रशासनाने बुजवून घ्यावेत. स्रानासाठी चंद्रभागा नदी पात्रात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.
- सर्जेराव शिंदे, कार्यकारी अभियंता, पंढरपूर विभाग
 
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग यावेळी जास्त आहे. त्यामुळे पाणी वाळवंटात बरेच वर येणार आहे. चंद्रभागा वाळवंटात वाळूचोरीमुळे पडलेले खड्डे बुजविण्यास आपण शुक्रवारीच सांगितले आहे. भाविकांच्या जीवाला धोका नको म्हणून आम्ही खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पाणी पंढरपुरात पोहोचेपर्यंत सर्व खड्डे आम्ही बुजविणार आहोत. तहसील आणि पोलीस नगरपालिकेला खड्डे बुजविण्यास सांगतात. अवैध वाळू चोरीकडे मात्र दुर्लक्ष करतात.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका