शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

उजनीतून भीमापात्रात सात हजार क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि.  24 - उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे. यामुळे रविवारी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे पाणी पंढरपूर बंधाºयात पोहोचणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.
उजनी धरणातून बुधवारी भीमा नदीपात्रात सुरूवातीला १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. गुरूवारी यामध्ये १५०० क्युसेक्सची वाढ केली. तर रविवारी दुपारी १ वाजता पुन्हा चार हजार क्युसेक्स पाण्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून वाहत आहे.
बुधवारी व गुरूवारी सोडलेल्या ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मीरे बंधा-यात शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचला आहे. पुन्हा सोडलेला ४००० क्युसेक्सचा विसर्ग अद्याप पुढील ३१०० क्युसेक्स पाण्याच्या विसर्गापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र रविवारी सकाळपर्यंत दोन्ही पाण्याचा विसर्ग एक होऊन रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत हा ७१०० क्युसेसचा विसर्ग पंढरपूर बंधाºयात पोहोचेल, असे सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुका हद्दीतील भीमा नदी पात्रात अवैध वाळूचोरीमुळे मोठे खड्डे पडले आहेत. ३ फूटापासून ५ फूटापर्यंतचे खड्डे नदीपात्रात असल्याने पाणी वाळूत मोठ्या प्रमाणात मुरत आहे. शिवाय हे खड्डे भरून पाणी पुढे सरकण्यासाठी वेळही लागत आहे. रविवारी सकाळी पिराची कुरोलीत पाणी येईल. मात्र तिथून पुढे किमान ८ तास पंढरपूर बंधाºयात हे पाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत. खेडभोसे, व्होळे, कौठाळी, करोळे, कान्हापूरी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाळू उपसा केल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे.
 
पाण्याचा विसर्ग शनिवारी दुपारी १ वाजता वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढेल. भीमा नदी पात्रात ब-याच गावच्या शेतकºयांनी विद्युतपंप बसविले आहेत, ते काढून घ्यावेत. शिवाय चंद्रभागा वाळवंटात पडलेले खड्डेही प्रशासनाने बुजवून घ्यावेत. स्रानासाठी चंद्रभागा नदी पात्रात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.
- सर्जेराव शिंदे, कार्यकारी अभियंता, पंढरपूर विभाग
 
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग यावेळी जास्त आहे. त्यामुळे पाणी वाळवंटात बरेच वर येणार आहे. चंद्रभागा वाळवंटात वाळूचोरीमुळे पडलेले खड्डे बुजविण्यास आपण शुक्रवारीच सांगितले आहे. भाविकांच्या जीवाला धोका नको म्हणून आम्ही खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पाणी पंढरपुरात पोहोचेपर्यंत सर्व खड्डे आम्ही बुजविणार आहोत. तहसील आणि पोलीस नगरपालिकेला खड्डे बुजविण्यास सांगतात. अवैध वाळू चोरीकडे मात्र दुर्लक्ष करतात.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका