शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

उजनीतून भीमापात्रात सात हजार क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि.  24 - उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग येत आहे. यामुळे रविवारी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे पाणी पंढरपूर बंधाºयात पोहोचणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सर्जेराव शिंदे यांनी दिली.
उजनी धरणातून बुधवारी भीमा नदीपात्रात सुरूवातीला १६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. गुरूवारी यामध्ये १५०० क्युसेक्सची वाढ केली. तर रविवारी दुपारी १ वाजता पुन्हा चार हजार क्युसेक्स पाण्याची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सध्या भीमा नदीपात्रात ७१०० क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून वाहत आहे.
बुधवारी व गुरूवारी सोडलेल्या ३१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मीरे बंधा-यात शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोहोचला आहे. पुन्हा सोडलेला ४००० क्युसेक्सचा विसर्ग अद्याप पुढील ३१०० क्युसेक्स पाण्याच्या विसर्गापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र रविवारी सकाळपर्यंत दोन्ही पाण्याचा विसर्ग एक होऊन रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत हा ७१०० क्युसेसचा विसर्ग पंढरपूर बंधाºयात पोहोचेल, असे सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुका हद्दीतील भीमा नदी पात्रात अवैध वाळूचोरीमुळे मोठे खड्डे पडले आहेत. ३ फूटापासून ५ फूटापर्यंतचे खड्डे नदीपात्रात असल्याने पाणी वाळूत मोठ्या प्रमाणात मुरत आहे. शिवाय हे खड्डे भरून पाणी पुढे सरकण्यासाठी वेळही लागत आहे. रविवारी सकाळी पिराची कुरोलीत पाणी येईल. मात्र तिथून पुढे किमान ८ तास पंढरपूर बंधाºयात हे पाणी पोहोचण्यासाठी लागणार आहेत. खेडभोसे, व्होळे, कौठाळी, करोळे, कान्हापूरी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाळू उपसा केल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे.
 
पाण्याचा विसर्ग शनिवारी दुपारी १ वाजता वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा वेगही वाढेल. भीमा नदी पात्रात ब-याच गावच्या शेतकºयांनी विद्युतपंप बसविले आहेत, ते काढून घ्यावेत. शिवाय चंद्रभागा वाळवंटात पडलेले खड्डेही प्रशासनाने बुजवून घ्यावेत. स्रानासाठी चंद्रभागा नदी पात्रात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.
- सर्जेराव शिंदे, कार्यकारी अभियंता, पंढरपूर विभाग
 
उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग यावेळी जास्त आहे. त्यामुळे पाणी वाळवंटात बरेच वर येणार आहे. चंद्रभागा वाळवंटात वाळूचोरीमुळे पडलेले खड्डे बुजविण्यास आपण शुक्रवारीच सांगितले आहे. भाविकांच्या जीवाला धोका नको म्हणून आम्ही खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पाणी पंढरपुरात पोहोचेपर्यंत सर्व खड्डे आम्ही बुजविणार आहोत. तहसील आणि पोलीस नगरपालिकेला खड्डे बुजविण्यास सांगतात. अवैध वाळू चोरीकडे मात्र दुर्लक्ष करतात.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका