शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंडी तालुक्यात दोन गावठी पिस्तुलांसह सात काडतुसे जप्त, चार संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 18:55 IST

इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात अनेक पिस्तूल आणि जिवन्त काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली़ सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली.

आॅनलाइन लोकमत सोलापूरविजयपूर दि ११ : इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात अनेक पिस्तूल आणि जिवन्त काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली़ सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना टाटा इंडिका मोटारसह अटक केली आहे. इजाज बंदेनवाज पटेल उर्फ बिरादार (रा. नंद्राळ), रजनीकांत उर्फ लाल्या मरेप्पा गिरिणीवड्डर, महेश श्रीशेल क्षत्री (दोघेही रा. बरगुडी), सिद्दप्पा नागप्पा हत्तूर (रा. भतगुणकी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. इंडी तालुक्यातील हलसंगीकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या नंद्राळ क्रॉसजवळ काहीजण बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्र घेऊन जाणार असल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शिवकुमार गुणारे तसेच विजयपूर व इंडी विभागाचे डीवायएसपी रविंद्र शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून सापळा रचण्यात आला. रविवारी ठरल्याप्रमाणे चडचण पोलीस स्थानकाचे सीपीआय एम. बी. आसोडे, झळकी पोलीस स्थानकाचे पीएसआय सुरेश बेंडेगुंबळ व इतर पोलीस अधिकाºयांनी हलसंगी क्रॉसजवळ सापळा रचला. याचवेळी केए २८ ए ४४७६ या क्रमांकाची एक कार येत असल्याचे पोलिसांना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी ही कार अडवून चौकशी केली. यावेळी इजाज, रजनीकांत, महेश व सिद्दप्पा यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवून कारची तपासणी करण्यात आली. कारमध्ये दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे आढळून आली.पोलिसांनी वरील चारही संशयितांना अधिक चौकशीसाठी अटक केली. तसेच त्यांनी वापरलेली कार, पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. आलमेल येथील काहीजणांना चन्दप्पा हरिजन तसेच भागप्पा च्या हस्तकांना गावठी पिस्तुले व जिवंत काडतुसे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असून या टोळीला सातत्याने मदत केल्याच्या आरोपावरून काही जणांना लवकरच अटक करणार असल्याचे सांगण्यात आले याप्रकरणी सर्वांवर झळकी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इंडी येथील न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी विजयपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.