शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

सलग दुसऱ्या वर्षी ग्रामीण अर्थकारण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

मागील मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लावलेला लॉकडाऊन तब्बल नऊ महिने वाढवला. त्यामुळे मोठ्या ...

मागील मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लावलेला लॉकडाऊन तब्बल नऊ महिने वाढवला. त्यामुळे मोठ्या शहरातील अनेक तरुण गावाकडे आले. या कालावधीत कोणी शेती निवडली, कोणी भाजी विकली तर कोण छोटेमोठे व्यवसाय करत कसाबसा कालावधी घालविला. त्यानंतर गेल्या जानेवारीपासून अर्थव्यवस्था जवळपास पूर्वपदावर येत शहरातील नोकऱ्या पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील व्यवसाय, शेतीची कामेही पुन्हा सुरू झाल्याने प्रत्येकाला रोजगार मिळत होता. मागील वर्षात काय कमावले, काय गमावले यापेक्षा रोजीरोटी भागत असल्याने सर्वसामान्य नागरिक समाधानी असतानाच ३० मार्चनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा मिनीलॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेक लहानमोठे उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प झाले आहेत. त्यामुळे शहराकडे गेलेले तरुण पुन्हा गावाकडे वळू लागले आहेत. गावात शेतीची कामे सुरू असली तरी त्यावर अवलंबून असलेले खते, बी-बियाणे, अवजारे, कीटकनाशके, सिंचनावर आधारीत सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतीची सर्व कामे बंद झाली आहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. अशी करुणाजनक परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

-----

शासनाचे आर्थिक पॅकेज ग्रामीण भागात पोहोचेना

मागील वर्षी लॉकडाऊन करताना राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज अनेक दिवस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नव्हते. यावर्षीही तोच अनुभव येत आहे. सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. बांधकाम कामगार, रिक्षाचालक आदींना आर्थिक मदतीचीही घोषणा झाली. मात्र ते पॅकेज अद्यापपर्यंत गरजू नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही. सरकार लॉकडाऊन जाहीर करून मोकळे होते, आम्ही जगायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शेती आधारित दुकाने सुरू ठेवा

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण अर्थकारण ८० टक्केपेक्षा जास्त शेती व पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे शहर व ग्रामीण भागातील शेतीवर आधारित असणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे, वीजपंप, पाइप व इतर दुरुस्तीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेली सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतीवर आधारित दुकाने, व्यवसाय सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतीमालाचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी व इतर फळबागांचे दर २५ टक्क्यांवर आले होते. काही शेतकऱ्यांचा माल तर २५ टक्क्यांनीही विकत घेण्याचे धाडस करत नव्हते. त्यामुळे वर्षभर पिकविलेला माल बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी तरी ती कसर भरून निघेल अशी अपेक्षा होत असताना काही दिवसात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, केळीचे नुकसान झाले. तर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने व्यापारी संगनमत करत शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे पुन्हा फळबागांचे दर गडगडण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.