शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सलग दुसऱ्या वर्षी ग्रामीण अर्थकारण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:23 IST

मागील मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लावलेला लॉकडाऊन तब्बल नऊ महिने वाढवला. त्यामुळे मोठ्या ...

मागील मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडून लावलेला लॉकडाऊन तब्बल नऊ महिने वाढवला. त्यामुळे मोठ्या शहरातील अनेक तरुण गावाकडे आले. या कालावधीत कोणी शेती निवडली, कोणी भाजी विकली तर कोण छोटेमोठे व्यवसाय करत कसाबसा कालावधी घालविला. त्यानंतर गेल्या जानेवारीपासून अर्थव्यवस्था जवळपास पूर्वपदावर येत शहरातील नोकऱ्या पुन्हा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील व्यवसाय, शेतीची कामेही पुन्हा सुरू झाल्याने प्रत्येकाला रोजगार मिळत होता. मागील वर्षात काय कमावले, काय गमावले यापेक्षा रोजीरोटी भागत असल्याने सर्वसामान्य नागरिक समाधानी असतानाच ३० मार्चनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा मिनीलॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेक लहानमोठे उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प झाले आहेत. त्यामुळे शहराकडे गेलेले तरुण पुन्हा गावाकडे वळू लागले आहेत. गावात शेतीची कामे सुरू असली तरी त्यावर अवलंबून असलेले खते, बी-बियाणे, अवजारे, कीटकनाशके, सिंचनावर आधारीत सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतीची सर्व कामे बंद झाली आहेत. मजुरांच्या हाताला काम नाही. अशी करुणाजनक परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

-----

शासनाचे आर्थिक पॅकेज ग्रामीण भागात पोहोचेना

मागील वर्षी लॉकडाऊन करताना राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज अनेक दिवस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले नव्हते. यावर्षीही तोच अनुभव येत आहे. सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. बांधकाम कामगार, रिक्षाचालक आदींना आर्थिक मदतीचीही घोषणा झाली. मात्र ते पॅकेज अद्यापपर्यंत गरजू नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही. सरकार लॉकडाऊन जाहीर करून मोकळे होते, आम्ही जगायचे कसे? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शेती आधारित दुकाने सुरू ठेवा

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण अर्थकारण ८० टक्केपेक्षा जास्त शेती व पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे शहर व ग्रामीण भागातील शेतीवर आधारित असणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे, वीजपंप, पाइप व इतर दुरुस्तीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेली सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतीवर आधारित दुकाने, व्यवसाय सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतीमालाचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी व इतर फळबागांचे दर २५ टक्क्यांवर आले होते. काही शेतकऱ्यांचा माल तर २५ टक्क्यांनीही विकत घेण्याचे धाडस करत नव्हते. त्यामुळे वर्षभर पिकविलेला माल बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी तरी ती कसर भरून निघेल अशी अपेक्षा होत असताना काही दिवसात झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, केळीचे नुकसान झाले. तर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने व्यापारी संगनमत करत शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. त्यामुळे पुन्हा फळबागांचे दर गडगडण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.