शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांमुळे अनुदान ठप्प

By admin | Updated: May 24, 2014 01:29 IST

ठिबक सिंचन अनुदान : कृषी खात्याच्या कारभारामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

सोलापूर: शेतकरी, पुरवठा एजन्सी व कृषी खात्याच्या संगनमताने वारंवार केलेला गैरप्रकार सोलापूर जिल्ह्याच्या अंगलट आला असून, मागील चार वर्षांपासूनचे ठिबक सिंचनचे अनुदान शासनाने थांबविले आहे. २०१०-११ ते १२-१३ या तीन वर्षांचे थकलेले १५ हजार शेतकर्‍यांचे ३७ कोटी ६८ लाख रुपये इतके अनुदान मिळण्याचे अधांतरी असल्याने २०१३-१४ या वर्षांची प्रकरणेच कृषी खात्याने स्वीकारलेली नाहीत. सोलापूर जिल्ह्याला व विशेषत: कृषी खात्याला गैरप्रकाराची परंपरा आहे. मागील काही वर्षांत कृषी खात्याच्या प्रत्येक योजनेत गैरप्रकार उघडकीला आला आहे. ठिबक सिंचन, फलोत्पादन, डाळिंब लागवड व अन्य प्रकारच्या सर्वच योजनेत कृषी खात्याच्या सौजन्याने गैरप्रकार झाला आहे. अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असून, अनेक प्रकरणे चौकशीविनाच दडपली आहेत. सांगोला, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यातील अनेक प्रकरणे मागील काही वर्षांत उघडकीला आली आहेत. दर दोन वर्षांनी साखळी पद्धतीने केलेला गैरप्रकार उघडकीला येतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाची सतत चौकशी सुरू असते. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी यांनी चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकरणे केली होती. याची झळ आता प्रामाणिक शेतकर्‍यांना बसू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ठिबक केलेल्या पात्र शेतकर्‍यांचे अनुदान मागील चार वर्षांपासून रखडले आहे. वारंवार कृषी खात्यात बोगसगिरी उघडकीला येत असल्याने कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सोलापूर जिल्ह्यासाठी योजना व अनुदान देणे अडचणीचे ठरु लागले आहे.त्यामुळे अनुदान देणेच बंद केलेले बरे यापर्यंत सरकार आले आहे. २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या तीन वर्षांत ठिबक केलेल्या जवळपास १५ हजार शेतकर्‍यांच्या अनुदानाची ३७ कोटी ६८ लाख इतकी रक्कम शासनाकडून आलेली नाही. या मागील वर्षांत ठिबक केलेल्यांची प्रकरणेच कृषी खात्याने स्वीकारणे बंद केले.

--------------------------

पाणी असून दुष्काळ! कृषी खात्याच्या मागणीप्रमाणे दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून भरीव कामे होण्याऐवजी अनुदान हडप करण्यात येते. यामुळे मागील काही वर्षांत कोट्यवधीचे अनुदान देऊनही शेततळी, नालाबंडिंग, सिमेंट बंधारे व अन्य कामे कागदावरच आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता कमी होत असताना सोलापूर जिल्ह्यात पाणी अडण्याची कृषी खात्याच्या कामाशिवाय उजनी धरणाचे पाणी असूनही दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.