शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सही मस्टरवरी अन्‌ साहेब मात्र घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ७ जूनपासून ग्रामीण भाग हा काही नियम करत अनलॉक केला. त्यात सर्व शासकीय कार्यालयेदेखील ५० टक्क्यांच्या ...

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ७ जूनपासून ग्रामीण भाग हा काही नियम करत अनलॉक केला. त्यात सर्व शासकीय कार्यालयेदेखील ५० टक्क्यांच्या आस्थापनेने सुरू राहतील, असे म्हटले होते. मात्र, येथील पंचायत समितीत ही परिस्थिती अद्यापही दिसून आली नाही. येथील कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, बालविकास अश्या अनेक विभागांत त्यांच्या विभागप्रमुखासह कर्मचारीही गैरहजर राहत आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली असून रिकाम्या हाताने त्यांना माघारी आपल्या गावी अशा परिस्थितीत जावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन संबंधित कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कशी राहील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

-----

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले की ते सर्व शासकीय यंत्रणेत फायनल समजले जातात आमच्या लेखी आदेशाची कोणी वाट पाहू नये ५० नव्हे तर १०० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आपापल्या कार्यालयात सर्वांनी लावाव्यात, अशा सूचना मी सर्व बीडीओंना दिलेल्या आहेत.

- परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) जिल्हा परिषद सोलापूर.

----

५० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थिती लावावी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे लागेल तेच कर्मचारी व अधिकारी आपण कार्यालयात बोलावत आहोत.

- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कुर्डूवाडी.

---

फोटो १५ कुर्डूवाडी

कुर्डूवाडी पंचायत समितीच्या अनेक विभागांतील सद्य:स्थितीत कार्यालय तर उघडे दिसते मात्र अधिकारी व कर्मचारी दिसत नाहीत.