शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘भगवा’ राज्य व्यापणार

By admin | Updated: July 21, 2014 01:21 IST

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : सेनेच्या उमेदवाराला निवडून द्या

बार्शी: राज्यातील सत्ताधारी सरकार सूडबुद्धीने कारभार करीत असून, येणाऱ्या निवडणुकीत भगवंताच्या आशीर्वादाने बार्शीमधून फडकणारा भगवा राज्य व्यापेल व महाराष्ट्र भगवामय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला़ येथील भगवंत मैदानावर ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, खा. रवींद्र गायकवाड, आ. ओमराजे निंबाळकर, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, तानाजीराव सावंत, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील, रविकांत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,अरूण बारबोले, रावसाहेब मनगिरे,भाऊसाहेब आंधळकर, संतोष निंबाळकर, दीपक आंधळकर आदी मान्यवर उपस्थित होते.मला माझ्या जुन्या सभेची आठवण होते. २००४ साली याच मैदानावर सभा घेतली होती. तोच उत्साह, तिच गर्दी, तशीच रोषणाई, तशीच आतषबाजी आजही पहावयास मिळते आहे. २००४ ला झालेल्या विजयाची या निवडणुकीतही पुनरावृत्ती होईल. नव्हे तर भगवंत बार्शीबरोबरच राज्यात सत्ता येण्यासाठी आशीर्वाद देईल़ भगवंताचा भगवा झेंडा खाली उतरला नाही पाहिजे, बार्शीचा आमदार सेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये. असा आवाहन त्यांनी केले़ यावेळी रामदास कदम, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, अस्मिता गायकवाड, श्रीधर कांबळे, किशोर मांजरे, राजा काकडे, प्रा. अशोक सावळे, दीपक आंधळकर यांचीही भाषणे झाली़-------------------------अजित पवारांना प्रतिआव्हानसंपूर्ण राज्यात शिवसेनेच्या सभांना होत असलेली गर्दी ही सेनेवर प्रेम करणाऱ्या सैनिकांची आहे. अशी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. कृषिमंत्री शरद पवारांना सत्तेत असताना पंतप्रधानांना भेटावेसे वाटले नाही. मात्र आमची सत्ता आल्यावर पंतप्रधानांना भेटावयास जाता. मग सत्तेत होता त्यावेळी काय करीत होता, त्यांना धरणांपेक्षा लावासासारखी शहरे उभी करावेसे वाटते, असा टोला ठाकरे यांनी हाणला़