शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘भगवा’ राज्य व्यापणार

By admin | Updated: July 21, 2014 01:21 IST

उद्धव ठाकरे यांचा विश्वास : सेनेच्या उमेदवाराला निवडून द्या

बार्शी: राज्यातील सत्ताधारी सरकार सूडबुद्धीने कारभार करीत असून, येणाऱ्या निवडणुकीत भगवंताच्या आशीर्वादाने बार्शीमधून फडकणारा भगवा राज्य व्यापेल व महाराष्ट्र भगवामय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी बार्शी येथे झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला़ येथील भगवंत मैदानावर ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, खा. रवींद्र गायकवाड, आ. ओमराजे निंबाळकर, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, तानाजीराव सावंत, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील, रविकांत पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले,अरूण बारबोले, रावसाहेब मनगिरे,भाऊसाहेब आंधळकर, संतोष निंबाळकर, दीपक आंधळकर आदी मान्यवर उपस्थित होते.मला माझ्या जुन्या सभेची आठवण होते. २००४ साली याच मैदानावर सभा घेतली होती. तोच उत्साह, तिच गर्दी, तशीच रोषणाई, तशीच आतषबाजी आजही पहावयास मिळते आहे. २००४ ला झालेल्या विजयाची या निवडणुकीतही पुनरावृत्ती होईल. नव्हे तर भगवंत बार्शीबरोबरच राज्यात सत्ता येण्यासाठी आशीर्वाद देईल़ भगवंताचा भगवा झेंडा खाली उतरला नाही पाहिजे, बार्शीचा आमदार सेनेचा झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.सेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधकांना उमेदवार शोधावे लागत आहेत, असा टोला त्यांनी लागावला. स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये. असा आवाहन त्यांनी केले़ यावेळी रामदास कदम, खा. रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, सभापती कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, अस्मिता गायकवाड, श्रीधर कांबळे, किशोर मांजरे, राजा काकडे, प्रा. अशोक सावळे, दीपक आंधळकर यांचीही भाषणे झाली़-------------------------अजित पवारांना प्रतिआव्हानसंपूर्ण राज्यात शिवसेनेच्या सभांना होत असलेली गर्दी ही सेनेवर प्रेम करणाऱ्या सैनिकांची आहे. अशी गर्दी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमवून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. कृषिमंत्री शरद पवारांना सत्तेत असताना पंतप्रधानांना भेटावेसे वाटले नाही. मात्र आमची सत्ता आल्यावर पंतप्रधानांना भेटावयास जाता. मग सत्तेत होता त्यावेळी काय करीत होता, त्यांना धरणांपेक्षा लावासासारखी शहरे उभी करावेसे वाटते, असा टोला ठाकरे यांनी हाणला़