शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पंढरपूर ग्रामीणमध्ये कोरोनावर ‘भोसे पॅटर्न’ ठरतोय सर्वाधिक प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

भोसे गावामध्ये सध्या जवळपास ४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून हे रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासनाने ...

भोसे गावामध्ये सध्या जवळपास ४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून हे रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम गावात ग्रामसमितीत असलेले सरपंच, उपसरपंच, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, डॉक्टर, पोलीस आदींच्या समितीने गावात एखादा संशयित रुग्ण जरी आढळला तरी त्याची प्राथमिक तपासणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. संसर्ग टाळण्यासाठी त्या व्यक्तीला आवश्यक ठिकाणी काही दिवस विलगीकरणात ठेवले जाते. त्यानंतरही तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला मानसिक आधार देण्यापासून आवश्यक असणारे उपचार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एखाद दुसरा रुग्ण सोडल्यास कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न लावता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम घालून दिल्यानंतर गावात लहान-मोठे व्यापारी, सर्व ग्रामस्थ आपल्या कोणत्याही नफा-तोट्याचा विचार न करता प्रशासनाचे नियम पाळत आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात छोट्या-छोट्या गावांमध्ये दररोज रुग्ण वाढत असले तरी मागच्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेले भोसे गाव मात्र या लाटेत कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहे. भोसेकरांनी राबविलेल्या या पॅटर्नमुळे तालुका प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे. भोसेप्रमाणेच इतर गावांनी योग्य नियोजन केल्यास कोरोनाला रोखणे अशक्य नाही. भोसे पॅटर्न इतर गावांना प्रभावीपणे राबविल्यास कोरोनावर नक्की विजय मिळवू, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

कोट :::::::::::::::::::::::

पहिल्या लाटेत माझ्यासह आमच्या अख्ख्या गावात सर्वाधिक नुकसान सहन केले आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही कोरोनाला हरवायचंच या उद्देशाने प्रशासनाने दिलेले नियम, अटींचे तंतोतंत पालन केले. ग्राम समितीमार्फत संशयित, पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर झालेले प्राथमिक उपचार यांची योग्य काळजी घेत यासाठी व्यापारी, पोलीस इतरांनीही योग्य सहकार्य केल्यामुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यास आम्ही यशस्वी होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णही कमी होत असल्याने लवकरच भोसे कोरोनामुक्त होईल.

- ॲड. गणेश पाटील

सरपंच, भोसे

कोट :::::::::::::::::::::

भोसे गावाने प्रशासनाने घालून दिलेले नियम तंतोतंत पाळले आहेत. त्याठिकाणी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. पॉझिटिव्ह झाल्यानंतर तो रुग्ण व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडपर्यंत जाऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्ण, मृत्यू, संशयित रुग्णांचे प्रमाणही घटत आहे. हेच नियम इतर गावांनी व शहरात पाळल्यास कोरोनाला रोखणे शक्य आहे.

- सचिन ढोले

प्रांताधिकारी, पंढरपूर

मानसिक आधार, संसर्ग रोखणे हेच प्रभावी उपचार

कोरोना झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते. त्यामुळे खचून पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रथम त्या रुग्णांना व त्याच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्याशिवाय योग्य काळजी घेत संसर्ग रोखणे हे गोळ्या औषधांपेक्षा सर्वात प्रभावी उपचार असल्याचे मत भोसेचे सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी व्यक्त केले.