शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यानंतरही आरटीपीसीआरचे रिपोर्ट येत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:23 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, कौठाळी, कळमण, बीबीदारफळ, गुळवंची, रानमसले व इतर गावांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची लक्षणे ...

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, कौठाळी, कळमण, बीबीदारफळ, गुळवंची, रानमसले व इतर गावांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसू लागली. रॅपिड टेस्ट केली असता पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाण वाढले आहे. आरटीपीसीआर टेस्ट केली असता तिचा अहवाल सहा-सात दिवस येत नसल्याचे चित्र आहे. तपासणीच्या रिपोर्टची वाट पाहत आजार अंगावर काढल्याने आजार वाढून उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. एकतर दवाखान्यात बेड मिळत नाही. शिवाय आजार वाढल्याने रेमडेसिविरची गरज भासते. मात्र, ते मिळत नाही. त्यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा कोलमडल्याने चित्र आहे. एप्रिल महिन्यातील २० दिवसांत ३६२ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या आहेत.

---

२१ दिवसांत १५ मृत्यू

बीबीदारफळ गावात २५ मार्च ते २१ एप्रिल या २१ दिवसांत कोरोना, इतर आजार व वृद्धापकाळाने १५ व्यक्ती दगावल्या आहेत. दवाखान्यात बेड मिळत नसल्याने इतर आजार असलेल्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने काहींचा जीव जात आहे. बीबीदारफळ येथील ६३ व्यक्तींची १५ व ४० व्यक्तींची १९ एप्रिल रोजी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. मात्र, तिचा अहवाल आलेला नाही.

---वडाळा परिसर हाॅटस्पाॅट

वडाळा येथे मंगळवारी रॅपिड टेस्टमध्ये ४८ पॉझिटिव्ह निघाले. त्यामध्ये वडाळ्याचे २७, बीबीदारफळचे १० व इतर लगतच्या गावातील आहेत. बुधवारी बीबीदारफळमध्ये पुन्हा १२ जण निघाल्याने येथील पॉझिटिव्ह संख्या १०९, तर वडाळ्याची १८७ झाली आहे.

----

दोन शेड, तीन शव

बीबीदारफळ येथील नरसूबाई मोतीराम चौगुले यांचे मंगळवारी निधन झाले. सार्वजनिक स्मशानभूमीत असलेल्या दोनपैकी एका शेडमध्ये नरसूबाईंचा अंत्यविधी करण्यात आला. बुधवारी नवनाथ गोरोबा साठे व सुनंदा उद्धव जाधव यांचा मृत्यू झाला. नरसूबाईंचा तिसरा बुधवारी झाला. त्यामुळे तेथे जागा नसल्याने नरसूबाईंच्या राखेशेजारीच एकाचा अंत्यविधी करावा लागला.

----