शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जयहिंदतर्फे ऊस उत्पादकांच्या खात्यात २१०० रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:40 IST

गणेश माने-देशमुख म्हणाले, यावर्षी जयहिंदचा गळीत हंगाम ६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या ...

गणेश माने-देशमुख म्हणाले, यावर्षी जयहिंदचा गळीत हंगाम ६ नोव्हेंबरपासून सुरू झाला. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसापोटी २१०० रुपये प्रतिटन असलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. २६ नोव्हेंबर पासून १४ जानेवारीपर्यंत गाळपास आलेल्या ऊसापोटी बिल अदा करण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यात पाच दिवसांचे नियोजन आहे. दर पाच दिवसांनी एक हप्ता याप्रमाणे बिल अदा केले जात आहे. विशेष म्हणजे १५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीतील बिल अदा केले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जयहिंद शुगर्सला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन गणेश माने-देशमुख यांनी केले आहे.

१ फेब्रुवारीनंतर १०० रुपये अधिकचा दर

१ फेब्रुवारीनंतर गाळपास येणाऱ्या ऊसाला २१०० आणि वाढीव १०० असे एकूण २२०० प्रतिटन दर देणार आहोत .विशेष म्हणजे १ फेब्रुवारीपासून ऊस आल्यानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची यंत्रणा उभी केल्याचे मार्गदर्शन बब्रुवान माने-देशमुख यांनी सांगितले.