शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

‘सहकार शिरोमणी’वर साखर आयुक्तांकडून आरआरसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

उर्वरित १९ कोटी ६९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आजही कारखान्याकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. ही रक्कम वेळोवेळी मागणी, आंदोलने ...

उर्वरित १९ कोटी ६९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आजही कारखान्याकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. ही रक्कम वेळोवेळी मागणी, आंदोलने करूनही कारखाना प्रशासनाकडून दिली गेली नाही. म्हणून कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, साखर आयुक्त (पुणे) व सहकारमंत्री यांच्याकडे तक्रार करत कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लेखी आदेश काढून १९६६ चे कलम ३ (८) अन्वये शेतकऱ्यांची एफआरपी थकविल्याप्रकरणी कारखान्यावर आरआरसीची कारवाई केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून कारखान्याने सर्व उत्पादित केलेले पदार्थ, आवश्यक पडल्यास कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करावी, त्याची विक्री करावी व शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह एफआरपीची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनावर खळबळ उडाली आहे.

या कारवाईनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस बिलासाठी हेलपाटे घालणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसे न झाल्यास कारखान्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा तक्रारदार दीपक पवार यांनी केला आहे.

शेतकरी, कारखान्याची मालमत्तेची माहिती द्या

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सहकार शिरोमणीवर कारवाई करताना कारखान्याचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनी कारखान्याला ऊस पुरवठादारांची प्रमाणित यादी व कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या विहित नमुन्यातील विवरणपत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या सहीशिक्क्यासह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ती उपलब्ध करून दिल्यानंतर याची माहिती साखर आयुक्त (पुणे), अप्पर मुख्य सचिव सहकार यांनाही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

साखर आयुक्तांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन

सहकार शिरोमणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे १९ कोटी ६९ लाख इतकी एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर कारखान्याला आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली होती. त्यानुसार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कारखान्याच्या वतीने शेती अधिकारी प्रतापराव थोरात यांनी म्हणणे सादर करून कारखान्यात उत्पादित झालेली साखर रिलीजप्रमाणे विक्री करून शेतकऱ्यांची वीज बिले अदा करण्याचे धोरण कारखान्याने ठरविले आहे. त्यामुळे कारखान्यावर कारवाई करू नये, असे लेखी म्हणणे दिले होते. मात्र, त्यानंतरही कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी व आंदोलने यामुळे नाईलाजास्तव साखर आयुक्तांना आरआरसीची कारवाई करणे भाग पडले.