शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘सहकार शिरोमणी’वर साखर आयुक्तांकडून आरआरसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

उर्वरित १९ कोटी ६९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आजही कारखान्याकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. ही रक्कम वेळोवेळी मागणी, आंदोलने ...

उर्वरित १९ कोटी ६९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आजही कारखान्याकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. ही रक्कम वेळोवेळी मागणी, आंदोलने करूनही कारखाना प्रशासनाकडून दिली गेली नाही. म्हणून कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, साखर आयुक्त (पुणे) व सहकारमंत्री यांच्याकडे तक्रार करत कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लेखी आदेश काढून १९६६ चे कलम ३ (८) अन्वये शेतकऱ्यांची एफआरपी थकविल्याप्रकरणी कारखान्यावर आरआरसीची कारवाई केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश काढून कारखान्याने सर्व उत्पादित केलेले पदार्थ, आवश्यक पडल्यास कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करावी, त्याची विक्री करावी व शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह एफआरपीची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारखाना प्रशासनावर खळबळ उडाली आहे.

या कारवाईनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस बिलासाठी हेलपाटे घालणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसे न झाल्यास कारखान्याविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा इशारा तक्रारदार दीपक पवार यांनी केला आहे.

शेतकरी, कारखान्याची मालमत्तेची माहिती द्या

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सहकार शिरोमणीवर कारवाई करताना कारखान्याचे लेखापरीक्षण करणाऱ्या लेखापरीक्षकांनी कारखान्याला ऊस पुरवठादारांची प्रमाणित यादी व कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या विहित नमुन्यातील विवरणपत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या सहीशिक्क्यासह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ती उपलब्ध करून दिल्यानंतर याची माहिती साखर आयुक्त (पुणे), अप्पर मुख्य सचिव सहकार यांनाही सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

साखर आयुक्तांच्या लेखी आदेशाचे उल्लंघन

सहकार शिरोमणी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे १९ कोटी ६९ लाख इतकी एफआरपीची रक्कम थकविल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर कारखान्याला आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली होती. त्यानुसार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कारखान्याच्या वतीने शेती अधिकारी प्रतापराव थोरात यांनी म्हणणे सादर करून कारखान्यात उत्पादित झालेली साखर रिलीजप्रमाणे विक्री करून शेतकऱ्यांची वीज बिले अदा करण्याचे धोरण कारखान्याने ठरविले आहे. त्यामुळे कारखान्यावर कारवाई करू नये, असे लेखी म्हणणे दिले होते. मात्र, त्यानंतरही कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी व आंदोलने यामुळे नाईलाजास्तव साखर आयुक्तांना आरआरसीची कारवाई करणे भाग पडले.