शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

जनभावनेचा आदर करा; पाच टीएमसी योजनेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करून उजनी जलाशयातून उचलण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाणी योजनेला स्थगिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमानगर : सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी जनभावनेचा आदर करून उजनी जलाशयातून उचलण्यात येणाऱ्या पाच टीएमसी पाणी योजनेला स्थगिती द्यावी; अन्यथा न्यायालयीन लढा उभा करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका आ. बबनराव शिंदे यांनी मांडली आहे.

उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्याबाबत आ. शिंदे म्हणाले की, १५ ऑक्टोबरनंतर दौंड येथून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी उजनीत येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

इंदापूर तालुक्यातील योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ५ टीएमसी पाणी योजना उजनी धरणातून नुकतीच मंजूर केल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटना, आमदार, खासदार, सामाजिक संघटना वेगवेगळ्या मार्गाने या योजनेला विरोध करू लागले आहेत. कारण, ही योजना मंजूर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

आ. शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील शासनाने दखल घेतली नाही तर जिल्ह्याच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, न्यायालयीन लढा देऊ, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने जनभावनेचा आदर करावा व या योजनेचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.

सध्या उजनीचे ८४.५० टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन झाले आहे. उजनीमधून दहा उपसा सिंचन योजना असून, त्यासाठी २१.७७ टीएमसी पाणी वापर होतो. मराठवाड्यासाठी ७.५ टीएमसी पाणी मंजूर आहे, तसेच प्रलंबित योजनांना ७ ते ८ टीएमसी पाणी वापर होतोय. या योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत, त्यांना १४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. सद्यपरिस्थितीतच उजनी पाण्यावरील सर्व लाभधारकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.

अजूनही मंगळवेढा, बार्शी, एकरुख, सीना-माढा उपसा सिंचन योजना पूर्ण नाहीत. या योजनांना शासनाने कोट्यवधींचा निधी दिलेला आहे. अशात उजनी धरणातून नवीन योजना मंजूर केल्या तर सोलापूर जिल्ह्यातील अगोदरच्या योजना पाण्याअभावी बंद पडणार व दिलेला निधी वाया जाणार. या गावांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे, असे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.