शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

आरक्षण बदललं.. नगरसेवकांचा भ्रमनिराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST

मोहोळ : तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आनुषंगाने नुकतेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर ...

मोहोळ : तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आनुषंगाने नुकतेच प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाले असून, अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे आरक्षण बदलल्याने अनेक नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला आहे. आपल्याला आता कोणत्या वॉर्डात संधी मिळेल यासाठी अनेकांची पळापळ सुरू झाली आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झालेल्या उमेदवारांनी आता कोणत्या पार्टीतून उभारल्यानंतर आपल्याला पुन्हा संधी मिळेल यासाठी धावपळ सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला शह देण्यासाठी शिवसेना, भाजपच्या बैठका झाल्या आहेत. दुसरीकडे सर्वच समविचारी मित्रपक्षांना बरोबर घेऊन एक आघाडी तयार करून प्रस्तापिताना शह देण्यासाठीही गुप्त बैठका सुरू आहेत.

पुढे जाऊन भाजपचा एक नगरसेवक व शिवसेनेचा एक नगरसेवक अशा दोघानी राष्टवादीला पाठिंबा देत राष्टवादीची संख्या ११वर नेली होती.

मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वच नगरसेवकांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेला निधी मिळाल्याने काही प्रभाग वगळता बहुतांश प्रभागांमध्ये विकासकामे झालेली आहेत. याच विकासकामाच्या जोरावर आम्हीच पुन्हा निवडून येऊ, असा आत्मविश्वास अनेक नगरसेवकांना होता. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने अनेकांना आता आपला वॉर्ड इतरत्र शोधण्याची पाळी आली आहे.

दुसरीकडे गत निवडणुकीत सर्वाधिक जागा असताना पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहावे लागलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तर आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. शिवसेना व राष्ट्रवादीला रोखण्यासाठी शहरातील सर्व समविचारी पक्ष व आघाड्यांना बरोबर घेऊन आघाडीच्या माध्यमातून नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी ही अनेकांच्या बैठका सुरू आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला दोन व काँग्रेसला दोन जागा मिळाल्याने आता भाजप व काँग्रेसनेही कंबर कसली असून, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार? असा पवित्रा दोन्ही पक्षांनी घेतला आहे.

सर्वच पक्षांची व आघाड्यांची पळापळ पाहता प्रभागनिहाय पडलेल्या आरक्षणानुसार कोणत्या वॉर्डात योग्य उमेदवार कोणत्या पक्षाकडून दिला जाणार यावरच त्या त्या पक्षाचे व पार्टीचे भवितव्य ठरणार आहे .

-----

चौकात, टपऱ्यांवर रंगू लागली चर्चा

सध्या शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चा चौकाचौकांत व पान टपरीवरही रंगू लागली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या सहा जागा आल्या होत्या. काँग्रेस दोन जागा आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या, तर रमेश बारसकर यांच्या विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. याचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने रमेश बारसकर आघाडीच्या तीन, काँग्रेसच्या दोन व राष्टवादीच्या चार अशा पद्धतीने नऊ जागेच्या जोरावर बहुमत सिद्ध करीत बारसकर यांना नगराध्यक्ष पदाचा मान दिला होता.

----