शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

पंतप्रधानांसह रेल्वे अन्‌ कृषिमंत्र्यांवर आचारसंहिता भंग गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST

ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ...

ग्रामपंचायत निवडणुका, लोकसभा व विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार घेणे बंधनकारक असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आदींनी २८ डिसेंबर २०२० रोजी सांगोला (जि. सोलापूर) येथे आदर्श आचारसंहितेचा उघडपणे भंग करून महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करण्यासाठी किसान रेल्वेच्या १०० व्या गाडीचा शुभारंभ कार्यक्रम दिमाखात साजरा केला.

हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा उघडपणे भंगच नव्हे, तर सत्तेच्या जोरावर निवडणूक आचारसंहिता पायदळी तुडविण्याचा प्रकार आहे, असा आक्षेप घेतला आहे. यासाठी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, कृषिमंत्री यांच्यासह संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करावी, असा तक्रारी अर्ज किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

-----

या आधारे केली तक्रार

आदर्श आचारसंहिता परिशिष्ट - २ मधील कलम १०, परिशिष्ट -३ मधील भाग-२ (१) परिशिष्ट मधील कलम -७, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांमधील कलम -७, नुकतेच म्हणजे ११ ते १७ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने पारित केलेले आदेश आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने निश्चित केलेले सिद्धांत या आधारे तक्रारी अर्ज दाखल केल्याचे कदम यांनी सांगितले.