शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

एमआरईजीएसच्या कामाला लाल फुली प्रशासनाचा नाकर्तेपणा;

By admin | Updated: May 9, 2014 00:29 IST

मागणी नसल्याचे सांगितले जाते कारण

सोलापूर : एमआरईजीएसमधून यावर्षी गांडूळ खतनिर्मिती, शेततळे व सिमेंट नालाबांधची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील सांगत असताना मागील दोन वर्षांपासूनच ही कामे प्रस्तावित असली तरी मागणीच नसल्याचे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांसाठी काहीच करायचे नाही?, असा पवित्रा प्रशासन व पदाधिकार्‍यांनी घेतल्याचा हा परिणाम आहे.सध्या जिल्‘ाला रस्त्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. गावोगावी पाणंद रस्त्याची मागणी आहे. पदाधिकारी व प्रशासनाने गावोगावच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी आहे. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी त्या शेतकर्‍यांची तयारी नाही. त्या मोबदल्यात मागणी असलेल्या गावात नव्याने विहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्याचीही शेतकर्‍यांची मागणी आहे. याशिवाय जनावरांसाठी गोठा, गांडूळ खतनिर्मितीच्या कामांची मागणी आहे. ही मागणी असताना जिल्हा परिषद व यंत्रणेकडे कसलेच नियोजन नाही. रोहयोच्या उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी गांडूळ खतनिर्मिती, शेततळी व सिमेंट नालाबांधाची कामे यावर्षी घेणार असल्याचे बुधवारी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी एम.आर.ई.जी.एस. मधून शेततळ्यांची कामे घेण्यासाठी शेतकर्‍यांची मागणीच नाही, परंतु राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेततळे होऊ शकतात, असे सांगितले. एम.आर.ई.जी.एस. मधून सध्या कोणत्याच कामाची मागणी नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले. -------------------------------------लोकांनी शेततळे व फलोत्पादनासाठी कृषी खात्याकडे मागणी नोंदवावी. एन.एच.एम.(राष्ट्रीय फलोत्पादन अभियान) मधून शेततळ्याला मागणी आहे़ एम.आर.ई.जी.एस.मधून शेततळे करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. गांडूळ खताची मागणी कोणी केली तर विचार करु.रफिक नाईकवाडीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ------------------------------------पाणंद रस्ते, जनावरांचा गोठा, खतनिर्मिती प्रकल्प ही कामे दोन वर्षांपासून प्रस्तावित आहेत. मागणीच नसल्याने ही कामे हाती घेऊ शकलो़ गावागावांतून विहिरींच्या कामांची मागणी आहे. मागणीप्रमाणे रस्त्यांची कामे सुरू आहेत.मनीषा देसाईउपमुख्य कार्यकारी अधिकारी------------------------------------महसूलने कामे करणार्‍यांना लटकावलेएम.आर.ई.जी.एस. ही योजना केवळ विहिरींच्या कामामुळे जिल्‘ातील गावोगावी पोहोचली. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विहिरींची कामे केल्यानेच अनेक कुटुंबांची शेती बागायती झाली आहे. परंतु पैशाच्या मागणीच्या, तांत्रिक बाबीवर बोट ठेवत महसूल खात्याने जि.प. ग्रामपंचायत विभागाला अडचणीत आणले. त्यामुळे आज जि.प.ची यंत्रणाही कामे करण्यास तयार नाही.