शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीची सेवा पुन्हा बंद; दररोज ७ ते ८ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि मार्चअखेर ती मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे १ एप्रिलपासून लालपरीची सेवा जवळपास ...

मात्र फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि मार्चअखेर ती मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे १ एप्रिलपासून लालपरीची सेवा जवळपास पूर्णपणे ठप्प करण्यात आली. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अशा काही लांबपल्ल्याच्या महत्त्वाच्या मोजक्याच गाड्या सोडल्या जात आहेत. तालुक्यांतर्गत व तालुकाबाह्य प्रवासी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू प्रवाशांना तातडीचा प्रवास करता येत नाही. तर महामंडळालाही याचा मोठा फटका बसत असल्याने दररोज किमान ७ ते ८ लाख रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

परिवहनचे आर्थिक नियोजन पुन्हा कोलमडले

राज्य परिवहन महामंडळ गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालत आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षभरापासून शेकडो कोटींचा तोटा एस.टी. महामंडळाला सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यात तर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही महामंडळाकडे पैसे उपलब्ध नव्हते. राज्य सरकारने अनुदान दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात यश आले. त्यानंतर मागील चार महिन्यापासून एस.टीची सेवा पूर्वपदावर येत असताना आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक नियोजन पुन्हा कोलमडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे तर गरजू प्रवाशांचे हाल होत आहेत.

कोट ::::::::::::::::::::::

सध्या पंढरपूर आगारातून काही महत्त्वाच्या गाड्या सोडल्या जात आहेत. एका गाडीत ३० प्रवाशांची भरती झाल्यावरच कोरोनाचे नियम पाळून बस सोडली जाते. ग्रामीण भागातील सर्व सेवा बंद केली आहे. त्यामुळे दररोज पंढरपूर आगाराला जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत आहे.

- एस. एस. सुतार

आगार प्रमुख, पंढरपूर