शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

१६ हजार २६४ लाभार्थ्यांचे सहा कोटींचे अनुदान प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST

केंद्र सरकारकडून संजय गांधी व राज्य सरकारकडून श्रावणबाळ, वृद्धापकाळ, निराधार, विधवा, अपंग, परित्यक्ता योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन देऊन ...

केंद्र सरकारकडून संजय गांधी व राज्य सरकारकडून श्रावणबाळ, वृद्धापकाळ, निराधार, विधवा, अपंग, परित्यक्ता योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन देऊन आधार दिला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शनवरच या लाभार्थ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह चालतो. मात्र, गेल्या नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सलग ७ महिने केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान प्रलंबित होते. त्यामुळे पेन्शनवर जगणाऱ्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.

योजनेतील लाभार्थी व अनुदान

संजय गांधी (सर्वसाधारण ३७०९ लाभार्थी १ कोटी ८६ लाख ३० हजार, अनुसूचित जाती ४८५ लाभार्थी २८ लाख ७२ हजार २०० रुपये), श्रावणबाळ (सर्वसाधारण ५६०६ लाभार्थी २ कोटी १७ लाख १० हजार रुपये, अनुसूचित जाती १५०० लाभार्थी ७७ लाख ३१ हजार रुपये), वृद्धापकाळ ४७२७ लाभार्थी ८५ लाख ८६ हजार, विधवा २१७ लाभार्थी ३ लाख ९० हजार ६०० रुपये, अपंग २६ लाभार्थी ४६ हजार ८०० रुपये, अशा १६ हजार २६४ लाभार्थ्यांचे ५ कोटी ९८ लाख ८९ हजार २०० रुपये अनुदान प्राप्त झाल्याचे अव्वल कारकून सुरेखा मस्के यांनी सांगितले.