शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

माणूस जोडण्यासाठीच विद्रोही चळवळ : पोळके

By admin | Updated: August 3, 2014 23:34 IST

विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचा समारोप

कोल्हापूर : विद्रोही चळवळ ही जाती घट्ट करण्याची चळवळ नसून, माणूस जोडण्यासाठीच ही चळवळ आहे. चळवळीसाठी पैशांची गरज लागत नाही, तर विचारांची पक्की बैठक असावी लागते. हीच विचारांची बैठक विद्रोही चळवळीमध्ये आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले. दसरा चौकातील संत जनाई नगरी, मुस्लिम बोर्डिंग सांस्कृतिक हॉल येथे आज, रविवारी बारावे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी डॉ. भारत पाटणकर होते. पोळके म्हणाले, विषमतावादी व जातीयवादी कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. क्रांती आणि परिवर्तन काही पटकन होत नाही तर त्यासाठी संयम बाळगावा लागतो. अशा साहित्य संमेलनातून विचारांचे प्रबोधन होतो आणि क्रांतीची ज्योत पेटते. अस्मिता निर्माण करण्यासाठी जातीयतेची गरज लागत नाही. प्रमुख पाहुणे अ‍ॅड. अण्णाराव पाटील म्हणाले, जोपर्यंत शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार समाजात रूजत नाहीत. तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. हे विचार युवापिढीमध्ये रूजविण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. असे झाले ठराव--शासकीय कार्यालयातून देव-देवतांच्या प्रतिमा काढण्यात याव्यात.--खैरलांजी ते खर्डा या घडलेल्या घटना म्हणजे दलित अत्याचार वाढलेला आहे. याचा निषेध विद्रोही करते. --महाराष्ट्र शासन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रत्येक वर्षी २५ लाख रुपये देते, याचा निषेध करण्यात आला. तसेच हे पैसे देण्याचे ताबडतोब बंद करावे, अन्यथा राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री व अर्थमंत्री यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.