शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘देशाच्या रक्षणासाठी सज्ज रहावे’

By admin | Updated: July 18, 2014 01:41 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री शैलेंद्र दळवी

सोलापूर : ब्रिटिश राजवटीत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू यांनी दिलेले बलिदान वाचणे आवश्यक असले तरी तसा इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या रक्षणासाठी तरुणांनी सज्ज रहावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले. शिवस्मारक सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात शैलेंद्र दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख रेवणसिद्ध प्याटी, महामंत्री चेतन शर्मा, महानगर अध्यक्ष धन्यकुमार बिराजदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात बोलताना शैलेंद्र दळवी म्हणाले की, जगाच्या पाठीवर भारत हा सर्वात तरुण देश आहे. तरुणाई ज्या दिशेने जाते त्याच दिशेने देश जात असतो. देशावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मदतीसाठी धाऊन जात असते. देशाचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक तरुणाचे रक्त सळसळले पाहिजे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे. न्यायिक भावनेने सर्वांची मदत करावी. सध्या महाविद्यालयांमध्ये निर्माण झालेले गढूळ वातावरण नाहीसे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाईट मार्गाला जाणाऱ्या तरुणाला आवरून त्याला चांगली दिशा देण्याचे काम केले पाहिजे. जागतिक पातळीवर देशावर जर संकट आले तर रक्षणासाठी सज्ज असले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पाटील यांनी केले तर आभार रेवणसिद्ध प्याटी यांनी मानले. -----------------लाख सदस्यांचा मानसयंदाच्या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन वाढीवर भर दिला पाहिजे. राज्यातून एक लाख सदस्य करण्याचा मानस आखण्यात आला आहे, त्यासाठी जोमाने काम करावे, असे यावेळी शैलेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.