शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘देशाच्या रक्षणासाठी सज्ज रहावे’

By admin | Updated: July 18, 2014 01:41 IST

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री शैलेंद्र दळवी

सोलापूर : ब्रिटिश राजवटीत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू यांनी दिलेले बलिदान वाचणे आवश्यक असले तरी तसा इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. देशाच्या रक्षणासाठी तरुणांनी सज्ज रहावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले. शिवस्मारक सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनात शैलेंद्र दळवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागप्रमुख रेवणसिद्ध प्याटी, महामंत्री चेतन शर्मा, महानगर अध्यक्ष धन्यकुमार बिराजदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात बोलताना शैलेंद्र दळवी म्हणाले की, जगाच्या पाठीवर भारत हा सर्वात तरुण देश आहे. तरुणाई ज्या दिशेने जाते त्याच दिशेने देश जात असतो. देशावर ज्यावेळी संकट येते त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मदतीसाठी धाऊन जात असते. देशाचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक तरुणाचे रक्त सळसळले पाहिजे. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे. न्यायिक भावनेने सर्वांची मदत करावी. सध्या महाविद्यालयांमध्ये निर्माण झालेले गढूळ वातावरण नाहीसे करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाईट मार्गाला जाणाऱ्या तरुणाला आवरून त्याला चांगली दिशा देण्याचे काम केले पाहिजे. जागतिक पातळीवर देशावर जर संकट आले तर रक्षणासाठी सज्ज असले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पाटील यांनी केले तर आभार रेवणसिद्ध प्याटी यांनी मानले. -----------------लाख सदस्यांचा मानसयंदाच्या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन वाढीवर भर दिला पाहिजे. राज्यातून एक लाख सदस्य करण्याचा मानस आखण्यात आला आहे, त्यासाठी जोमाने काम करावे, असे यावेळी शैलेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.