शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

बैलांच्या नांगरटी झाल्या दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST

कृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरट. ...

कृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी जमिनीतील पहिली पायरी म्हणजे उन्हाळी नांगरट. सध्या या नांगरटी अंतिम टप्प्यात आल्या असून रोहिणी व मृग नक्षत्राच्या दृष्टीने शेतीच्या मशागती उरकल्या जात आहेत. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत. मात्र, अद्याप काही ठिकाणी बैलजोडी मशागती करतानाचे दुर्मीळ चित्र तालुक्यात दिसत आहे.

बैलांच्या नांगरटीला होते महत्त्व

एकेकाळी शेती, शेतकरी अन् बैल हे नाते अतूट होते. ज्याच्याकडे जास्त बैल तो शेतकरी श्रीमंत मानला जायचा. थंडी कमी झाली की ज्वारी, गहू, हरभरा, सुगी संपताच सर्वत्र जमिनीच्या नांगरटी सुरू व्हायच्या. हे काम कष्टप्राय असल्याने जमीन मालक इतर शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आमंत्रण देत असत. याला ‘इरजीक’ म्हणत. यासाठी अनेक शेतकरी बैलजोडी घेऊन नांगरणी करीत व सायंकाळी त्याच शेतात जेवणाचा आस्वाद घेतला जाई. एकमेकांच्या शेतीकामात मदत करीत कामे पूर्ण केली जायची. बैलाच्या नांगरणीमुळे जमीन तुडवली जात नाही. शिवाय शेताच्या बांधापर्यंत मशागत होते. या नांगरामागे फिरणारे पक्षी जमिनीतील विषारी जिवाणू खातात. अशा अनेक गोष्टींमुळे बैल शेतीला फार महत्त्वाचे होते. मात्र आता बैल शेती दुर्मीळ होत आहे.