शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

माढ्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: May 14, 2014 01:26 IST

महिलांचा घागर मोर्चा; आजपासून सलग भारनियमन

 

माढा : माढा शहराच्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ येथील प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनल साठे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तहसील कार्यालयावर मंगळवारी घागर मोर्चा काढला. यामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. कूर्मदास कारखान्यापासून या मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन घोषणा देत व हातात घागरी घेऊन मोर्चा तहसील कार्यालयावर आला. शहराची लोकसंख्या १५ हजारांच्यावर आहे. नळ पाणीपुरवठा योजना अयोग्य व चुकीच्या नियोजनामुळे शहराची पाण्याची गरज भागवू शकत नाही. दहा ते बारा दिवसांनंतर पाणी सोडले जाते, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रमेश शेंडगे यांना देण्यात आले. यानंतर माढा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सज्जन जाधव यांना शुद्ध व आवश्यक त्या उपाय, सुधारणा करुन नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार शेंडगे यांनी दिल्या. या मोर्चात गीतांजली देशमुख, कामिनी गवळी, अपर्णा मेहता, अनुराधा गोटे, वंदना लंकेश्वर, रेणुका माळी, आशा काटे, रेखा चवरे, संगीता साठे, मालन साठे, कविता साठे, शांता साठे, विमल कानडे, राधा देवकर, सुजाता राऊत, सुजाता खरात आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

-----------------------

माढ्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आमदार बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत पाच मे रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता साळी, सभापती रणजितसिंह शिंदे, उपसरपंच राजेंद्र चवरे यांची बैठक झाली. यावेळी येवती तलावा वरील भारनियमन दोन टप्प्यावरुन एका टप्प्यात करण्याचा निर्णय झाला. पाच ते १२ या वेळेत भारनियमन ठेवण्यात आले. दुपारी १२ ते पहाटे पाच या वेळेत वीज चालू ठेवली, यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. -झुंजार भांगे, जि. प. सदस्य