शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

तळंदगेत ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव

By admin | Updated: January 28, 2015 01:00 IST

ग्रामसभेत ठराव : ग्रामपंचायतीने उभारला बातम्यांचा फलक

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी आयोजित ग्रामसभेमध्ये ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई हुपरे होत्या.गावाच्या समस्यांबाबत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आवाज उठवून शासनदरबारी समस्या मांडणाऱ्या ‘लोकमत’मधील प्रसिद्ध बातम्यांची कात्रणे असणारा भलामोठा डिजिटल फलक ग्रामपंचायतीने उभारला होता. परिणामी, गावामध्ये प्रजासत्ताकदिनी फक्त आणि फक्त ‘लोकमत’चीच चर्चा होती. वर्षभरात ग्रामपंचायतीने गावामध्ये केलेली विविध विकासकामे, चालू वर्षाच्या कालावधीमध्ये करावयाच्या विकासकामांचे नियोजन याबाबतची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशांचे वितरण, तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अकरा वाजता ग्रामसभेच्या कामकाजास सुरुवात झाली. सभेत विषयांचे व परिपत्रकांचे वाचन ग्रामसेवक एम. व्ही. पाटील यांनी केले. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत ग्रामपंचायतीने काय प्रयत्न केले व कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबतची सविस्तर माहिती उपसरपंच राजेंद्र हवालदार यांनी दिली. सन २०१२ पर्यंत निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाशी वेळोवळी भांडण करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला आहे. त्याला ‘लोकमत’ने नेहमीच साथ दिली आहे. (वार्ताहर)निर्भीड पत्रकारितागावातील प्रदूषणाच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने निर्भीडपणे सातत्याने बाजू मांडली आहे. त्याबद्दल ग्रामसभेमध्ये ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा मुद्दा आबिद मुल्लाणी यांनी मांडला. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या ठरावास मंजुरी दिली.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या उभारणीमुळे तळंदगे (ता. हातकणंगले) गावामध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी उठविलेल्या आवाजाची कात्रणे असणारा फलक ग्रामपंचायतीच्यावतीने प्रजासत्ताकदिनी उभारला आहे.