शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खानापूर रेल्वे पुलाखाली सापडलेला मृतदेह मनोरुग्णाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

अक्कलकोट : खानापूर (ता. अक्कलकोट) येथील रेल्वेपुलाखाली पाण्यात आढळलेल्या बेवारस मृतदेहाची अखेर ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. ती ...

अक्कलकोट : खानापूर (ता. अक्कलकोट) येथील रेल्वेपुलाखाली पाण्यात आढळलेल्या बेवारस मृतदेहाची अखेर ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. ती मृत व्यक्ती विजयपूर (कर्नाटक) येथील अविनाश शिवराम घोरपडे (वय ४०) असून, पोलिसांनी सोशल मीडियातून फिरवलेली त्याची माहिती नातेवाइकांपर्यंत पोहोचली.

याबाबत दक्षिण पोलीस ठाण्याने याची नोंद घेतली आहे.

९ फेब्रुवारी रोजी खानापूर येथील रेल्वे पुलाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पाण्याच्या कडेला तो तरंगत होता. याबाबत कोतवाल जगदीश देसाई यांनी अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात खबर दिली. ओळख पटत नसल्याने मृताच्या वर्णनाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. मृत व्यक्तीचा भाऊ राजू घोरपडे याच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. त्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याची ओळख पटताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो मनोरुग्ण होता. दवाखान्यातून गोळ्या घेऊन येतो, असे सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत घरी परतलाच नाही. या शोधकार्यात हवालदार मल्लिनाथ कलशेट्टी, लक्ष्मण कांबळे, वीरभद्र उपासे, संजय पांढरे, सिकंदर मुल्ला यांनी सहभाग नोंदवला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.