शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

एकरुखच्या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन ...

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन सप्टेंबर २०२० मध्ये कार्यान्वित झाला आहे. योजनेचे मुख्य कालवे झाले आहेत. परंतु वितरण व्यवस्थेची कामे अद्याप बाकी आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये १०० कोटी लागणार आहेत. कालव्याची कामे पूर्ण होऊन ७ हजार २०० क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व २१ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तरी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कालव्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आपण द्यावेत आणि १०० कोटींची तरतूद करून हा निधी तालुक्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बोरी नदीवरील बबलाद येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत, तसेच या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अश्पाक बळोरगी, महेश वानकर, मोहन देडे, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.

......

दोन दिवसात पाच मंत्र्यांची भेट

अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामांसाठी माजी मंत्री सिद्धारम म्हेत्रे यांनी दोन दिवसात पाच मंत्र्यांची भेट घेऊन कामांच्या मागणीचे पत्र दिले. जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेण्यात आल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.

.......

फोटो ओळ

एकरुख योजनेच्या निधीबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याही चर्चा करताना माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील आदी.

(फोटो ०२ चपळगाव म्हेत्रे

020921\img-20210901-wa0033.jpg

एकरूख योजना व बबलाद बंधाऱ्यासंबधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, मल्लिकार्जून पाटील व अन्य