शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नवदाम्पत्यांनी केले वृक्षारोपण

By admin | Updated: July 8, 2016 19:04 IST

विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़

वैराग येथील घटना : अशीही नवजीवनाची सुरुवातवैराग : विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़ सध्या शासनस्तरावर वृक्ष लागवडीची मोहीम सुरू आहे़ यामध्ये सामाजिक, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत़ परंतु स्वत: वृक्षारोपण करून इतरांना प्रेरणा देण्याचे महत्वपूर्ण काम सत्यवान-शुभांगी या नवदाम्पत्यांनी केले़ इर्ले (ता़ बार्शी) येथील बाळासाहेब शिंदे यांची कन्या शुभांगी व तांदुळवाडी (ता़ माळशिरस) येथील दादासाहेब चव्हाण यांचे चिरंजीव सत्यवान यांचा विवाह गुरुवारी वैराग येथील मातोश्री मंगल कार्यालयात पार पडला़ शुभांगी व सत्यवान यांच्यावर अक्षता पडताच प्रथमत: त्यांनी येथील मैदानात वृक्षारोपण करून रोपाचा आशीर्वाद घेतला़ या उपक्रमामुळे आलेल्या वऱ्हाडी मंडळींसह सर्वांसाठीच त्यांनी हा एक आदर्श घालून दिला आहे़ यावेळी त्यांचे आई-वडील, नातेवाईक, हितचिंतक, वऱ्हाडी मंडळी, माजी सरपंच भारत शिंदे, कार्यालयाचे व्यवस्थापक दिलीप खेंदाड उपस्थित होते़