शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षांवर प्राध्यापकांचा बहिष्कार, १२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

By admin | Updated: January 12, 2017 15:09 IST

शासनाला जाग आणण्यासाठी फेब्रुवारी २०१७ च्या बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय प्राध्यापकांनी घेतला.

अमरसिंह खांडेकर, ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १२ -  १६ वर्षापासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे २२,५०० प्राध्यापक व ३५०० कर्मचारी काम करीत आहेत. २०१४ साली कायम विनाअनुदानित हा शब्द काढून यासाठी लागणारा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला. मात्र मागील तीन वर्षापासून प्राध्यापकांना ताटकळत ठेवणा-या शासनाला जाग आणण्यासाठी फेब्रुवारी २०१७ च्या बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी दिली. या आंदोलनामुळे राज्यातील बारावीच्या १२ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे.
न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे शाळा कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. जे. खडतरे, प्राचार्य व्ही. व्ही. वाघमोडे, उपप्राचार्य एन. डी. माने, पुणे विभाग कृती समितीचे संघटक प्रा. व्ही. एम. खंदारे, प्रा. सुनिल भोर, प्रा. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कायम शब्द वगळलेल्या शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, जून्या शिक्षकांवर अन्याय करणाºया शाळांची संच मान्यता व मूल्यांकन तपासणी यादी जाहीर करू नये, अतिरिक्त शिक्षकांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. २०१४ मध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम हा शब्द शासनाने काढला. परंतु तीन वर्षे झाली तरी पात्र शाळांची यादी जाहीर केली नाही. शासनाने आजवर एक रूपयांचेही अनुदान दिले नाही. विनावेतन प्राध्यापकांना काम करावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील २२,५०० प्राध्यापक व ३,५०० कर्मचाºयांची परिस्थिती बिकट झाली आहे. याकडे शासनाने पूर्ण दुर्लक्ष केल्याने फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाºया बारावीच्या परिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील तोंडी परीक्ष, प्रात्यक्षिक परिक्षा, सुपरव्हीजन, पेपर तपासणी आदी कामे केली जाणार नाहीत.
१६ जानेवारीला पुणे येथील शिक्षक संचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय, एचएससी बोर्ड कार्यालयावर संघटनेचे राज्य अध्यक्ष टी. एस. नाईक यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार  आहे. राज्यातील १२ लाख विद्यार्थ्यांचे या आंदोलनामुळे नुकसान होणार आहे. राज्यातील प्राध्यापकांनी सामुहिक रजा टाकून १६ जानेवारीला पुणे येथील गांजवे चौक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर यांनी केले आहे.
सूत्रसंचालन प्रा. एन. के. देशमुख यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. निलेश नागणे यांनी केले. प्राध्यापक मिलींद  देशमुख यांनी आभार मानले.