शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

अगोदर निवडणुका अन् मग सरपंच पदाचे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निघण्यापूवीच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे धांदल उडालेल्या पॅनेलप्रमुखांना ग्रामविकास खात्याने आता आणखी एक धक्का ...

ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निघण्यापूवीच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे धांदल उडालेल्या पॅनेलप्रमुखांना ग्रामविकास खात्याने आता आणखी एक धक्का दिला आहे. १६ डिसेंबर रोजी होणारे सरपंचपदाचे आरक्षण चक्‍क निवडणुकीनंतर करण्याचे फर्मान सोडले आहे.

आता राजकीय पक्षप्रमुख, पॅनेलप्रमुखांसह सर्वच इच्छुक उमेदवारांना देव पाण्यात ठेवून निवडणूक लढवावी लागणार आहे.

करमाळा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी या गावच्या सरपंचपदाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत अद्याप झालेली नाही. त्यांनी १५ जानेवारीनंतर आरक्षण जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे अंधारात तीर मारण्याची वेळ पॅनलप्रमुखांवर आली आहे.

यापूर्वी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जात होते. त्यानुसार विविध राजकीय पक्षांचे पॅनल ठरले जात होते. तसेच सरपंचपदाचा संभाव्य उमेदवार गृहित धरून निवडणुका लढल्या जात होत्या.

मात्र सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कोरोना संसर्गामुळे वेळेत होऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवार, १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

नियोजित ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर १५ जानेवारी रोजी आरक्षण सोडत घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ सुरू झाली असून संभाव्य सरपंच कोण असणार, हे कोणालाच माहीत नसताना निवडणुका लढायच्या कशा, असा सवाल आता राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे.

----

वरातीमागून घोडे असल्याचा प्रकार

प्रशासनाचा हा हलगर्जीपणा असून, ‘निवडणुकीनंतर आरक्षण म्हणजे वरातीमागून घोडे’, असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे याचा निवडणुकीच्या मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संभाव्य सरपंच कोण आहे, हे या परिपत्रकामुळे अधांतरीच राहणार असल्याने इच्छुकांचा उत्साहही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

----

निवडणुकीनंतरच सरपंचपदाचे आरक्षण

सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम शासनाचीच जबाबदारी आहे. सरपंचपद आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, नुकतेच ग्रामविकास खात्याचे पत्र आले असून, ही आरक्षण सोडत आता १५ जानेवारीनंतर घेण्यात येणार आहे, असे तहसीलदार समीर माने यांनी स्पष्ट केले.