शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

पावसासाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST

अहले हदीस ईदगाह : मौलाना ताहेर बेग यांचे प्रवचन

सोलापूर : जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने शहरातील मुस्लीम बांधवांनी रविवारी सकाळी पावसासाठी रंगभवन येथील अहले हदीस ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठण केले. भरपूर पाऊस पडून समस्त मानव जातीमध्ये सुख, शांती, समाधान नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली. प्रेम, शांती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी आपल्या प्रवचनात केले. निसर्ग नियमाप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात उजनी धरणातील पाणीपातळी वजा २० टक्क्यांवर गेल्याने भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे आता पावसाची गरज निर्माण झाली आहे. यंदा चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी ईदगाह मैदानावर नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. नमाज पठणापूर्वी बोलताना मौलाना ताहेर बेग म्हणाले की, पैसेवाले लोक जकात भरत नसतील, उद्योग-व्यवसायात सर्वसामान्य माणसाची फसवणूक करीत असतील तर या दोन कारणास्तव पाऊस होत नसतो. तसेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी अल्लाहकडे माफी मागून अपेक्षित कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. त्यावर ‘अल्लाह’ आपले गुन्हे माफ करतो आणि पाऊस पाडतो. माणसाची नीतिमत्ता बदलत आहे, त्याचा परिणाम समस्त मानव जातीवर होत असतो, त्यामुळे ‘अल्लाह’ च्या आदेशानुसार आचरण केल्यास सुख, शांती कायम ठेवून विकास साधण्यास वेळ लागत नाही. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांप्रति स्नेहसंबंध, महिलांविषयी आदर बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी केले. यावेळी मुख्तार अहमद हुमनाबादकर, माजी महापौर आरिफ शेख आदी मान्यवरही उपस्थित होते. ---------------------------अनेकांनी वाहिले अश्रू...नमाज पठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन अनेक मुस्लीम बांधवांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भरपूर पाऊस होऊ दे, समस्त मानव जातीची भरभराट होऊ दे, सुख, शांती नांदू दे अशी प्रार्थना केली.