शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

By admin | Updated: July 7, 2014 00:59 IST

अहले हदीस ईदगाह : मौलाना ताहेर बेग यांचे प्रवचन

सोलापूर : जून महिना संपला तरी पाऊस न आल्याने शहरातील मुस्लीम बांधवांनी रविवारी सकाळी पावसासाठी रंगभवन येथील अहले हदीस ईदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठण केले. भरपूर पाऊस पडून समस्त मानव जातीमध्ये सुख, शांती, समाधान नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली. प्रेम, शांती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी आपल्या प्रवचनात केले. निसर्ग नियमाप्रमाणे जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. जून महिना संपला तरी पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात उजनी धरणातील पाणीपातळी वजा २० टक्क्यांवर गेल्याने भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे आता पावसाची गरज निर्माण झाली आहे. यंदा चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी ईदगाह मैदानावर नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. नमाज पठणापूर्वी बोलताना मौलाना ताहेर बेग म्हणाले की, पैसेवाले लोक जकात भरत नसतील, उद्योग-व्यवसायात सर्वसामान्य माणसाची फसवणूक करीत असतील तर या दोन कारणास्तव पाऊस होत नसतो. तसेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, भ्रष्टाचार होत आहे. त्यासाठी अल्लाहकडे माफी मागून अपेक्षित कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. त्यावर ‘अल्लाह’ आपले गुन्हे माफ करतो आणि पाऊस पाडतो. माणसाची नीतिमत्ता बदलत आहे, त्याचा परिणाम समस्त मानव जातीवर होत असतो, त्यामुळे ‘अल्लाह’ च्या आदेशानुसार आचरण केल्यास सुख, शांती कायम ठेवून विकास साधण्यास वेळ लागत नाही. सर्वांनी एकत्र येवून एकमेकांप्रति स्नेहसंबंध, महिलांविषयी आदर बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी मौलाना ताहेर बेग यांनी केले. यावेळी मुख्तार अहमद हुमनाबादकर, माजी महापौर आरिफ शेख आदी मान्यवरही उपस्थित होते. ---------------------------अनेकांनी वाहिले अश्रू...नमाज पठणादरम्यान ‘अल्लाह’कडे एकरूप होऊन अनेक मुस्लीम बांधवांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. भरपूर पाऊस होऊ दे, समस्त मानव जातीची भरभराट होऊ दे, सुख, शांती नांदू दे अशी प्रार्थना केली.