शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अनागोंदी कारभार लपविण्यासाठीच महाराष्ट्रात लसीकरणाचे राजकारण : केशव उपाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:22 IST

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेल्या केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ थिटे, शहराध्यक्ष ...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेल्या केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ थिटे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, अनुप देवधर, शंतनु दंडवते, प्रणव बाडगंडी आदी उपस्थित होते.

यावेळी उपाध्ये यांनी विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन’ हे सोल्युशन नाही, अशी परिस्थिती सुरू असल्याचा टोला लगावला. कोरोनाची महामारी असतानाही राज्य सरकार लसीकरणावरून करीत असलेले राजकारण भयंकर आहे. देशात सर्वाधिक लस महाराष्ट्राला मिळाली आहे. केवळ महाराष्ट्र, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांना एक कोटीहून अधिक लसीचे डोस दिले आहेत, परंतु सुरुवातीला राज्य सरकारने लसीकरणाचा वेग वाढविला नाही, याची यंत्रणाही उभारली नाही. राज्यातील मंत्रीच या लसीविषयी शंका उपस्थित करीत होते. यामुळे लसीकरण वेगाने न झाल्यानेच, आज महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला.

कोरोना हातळण्यात आलेले अपयश, मंत्र्यांचा भ्रष्ट कारभार, वाझे प्रकरण यावरून लक्ष हटविण्यासाठी लसीकरणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. आजही २४ लाख लसीचे डोस शिल्लक असल्याचा दावा त्यांनी करून तुमच्या राजकारणासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळू नका, असे आवाहन केले.

सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री व विविध नेते मंडळी पंढरपूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्‍वासन देत आहेत, परंतु मागील दीड वर्षात एक रुपयाचा नवा निधी या सरकारने दिला नाही. पंढरी हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असूनही येथे निधी न दिल्यामुळे विकासकामे ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला असून, आरोग्य यंत्रणा कोसळली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्येही उपमुख्यमंत्री केवळ एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पंढरीत दोन दिवस मुक्काम करतात, हे जनतेचे दुर्दैव असल्याचीही त्यांनी टीका केला.