शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी, कलाकारांना मुखवटे घालावे लागतात : भार्गवी चिरमुले

By admin | Updated: September 3, 2014 00:53 IST

उद्योग बँकेच्या गणेशोत्सव व्याख्यानमाल

सोलापूर : राजकारणी आणि कलाकारांना अधिक मित्र नसतात; पण असलेले विचार, आचार आणि जवळीकतेने होतात. या दोन्ही पेशांतील लोकांना स्वत:चे दु:ख व आनंद विसरून समाजासाठी मुखवटे घालून फिरावे लागते. यामुळे त्यांचे खरे चेहरे कधीच उजेडात येत नाहीत, असे प्रतिपादन सिने व नाट्य अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केले.उद्योग बँकेच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत मंजुषा गाडगीळ यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. मी ज्या कुटुंबातून आले ते कुटुंब संस्कारक्षम होतं. यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. सुरूवातीला मला नृत्याची आवड होती. टी.व्ही़ किंवा गाणे लागल्यानंतर वाकडे—तिकडे नाचत होते. माझ्यात दडलेल्या नृतिकेला ओळखून माझ्या आईने नृत्याच्या क्लासला जाण्याची मुभा दिली. यामुळे शिकत गेले आणि या क्षेत्रात आले. पालकांनी आपल्या मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असून, त्यांच्यावर चांगले संस्कारही होणे गरजेचे आहे. मुलांवर पालकांमुळेच नाही तर समाजामुळेही संस्कार होत असतात; मात्र मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांनी दक्ष राहून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुले आज कोणत्याही बीभत्स गाण्यांवर नृत्य करतात. याबाबत खंत व्यक्त करीत त्यांच्यासाठी खास चांगली गाणी निवडाव्यात, यामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. मालिकांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, महिला मालिकांशी एकरूप होत असल्याने त्यांना सर्वाधिक मालिका आवडतात. रोज सोप म्हणजे दररोज दिसणाऱ्या मालिकांविषयी महिला नाराजी व्यक्त करीत असल्या तरी पाहण्याच्या वेळा मात्र कधीच टाळू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट स्वत:ला घडण्यासाठी आहे, असे समजून काम केल्यास निश्चितच यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.