शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

By admin | Updated: May 11, 2014 00:17 IST

शेतकर्‍यांची तक्रार

सोलापूर : एकीकडे पिकांचे पंचनामे केले नसल्याच्या तक्रारीसाठी गारपीटग्रस्त शेतकरी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत आहेत़ दुसरीकडे पुढार्‍यांच्या दहशतीमुळे चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील पंचनामे झाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे़ या दहशतीचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ गारपीट आणि अवकाळी पावसाने चुंगी येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले़ कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांच्या पथकाकडून नुकसानीचे रितसर पंचनामे सुरू होते़ येथील राजकीय पुढार्‍यांनी कृषी सहायक लादे, तलाठी भोरे यांना फोनवरून दमदाटी केली़ आम्ही सांगू त्याच शेतकर्‍यांचे पंचनामे करा, दुसर्‍यांचे कराल तर याद राखा, असा दम भरला़ या दहशतीमुळे पथकाने काही शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे टाळले़ गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची हानी होऊनही दबावामुळे पंचनामे झाले नाहीत़ याचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ एकीकडे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणी धडपडतात तर चुंगीत विरोध करण्यात आला़ याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ शेतकर्‍यांनी या प्रकाराची माहिती दिली़ वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)