शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

राजकीय हस्तक्षेपाचा गारपीटग्रस्तांना फटका चुंगीत पंचनामे टाळले :

By admin | Updated: May 11, 2014 00:17 IST

शेतकर्‍यांची तक्रार

सोलापूर : एकीकडे पिकांचे पंचनामे केले नसल्याच्या तक्रारीसाठी गारपीटग्रस्त शेतकरी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेत आहेत़ दुसरीकडे पुढार्‍यांच्या दहशतीमुळे चुंगी (ता़ अक्कलकोट) येथील पंचनामे झाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे़ या दहशतीचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ गारपीट आणि अवकाळी पावसाने चुंगी येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले़ कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवकांच्या पथकाकडून नुकसानीचे रितसर पंचनामे सुरू होते़ येथील राजकीय पुढार्‍यांनी कृषी सहायक लादे, तलाठी भोरे यांना फोनवरून दमदाटी केली़ आम्ही सांगू त्याच शेतकर्‍यांचे पंचनामे करा, दुसर्‍यांचे कराल तर याद राखा, असा दम भरला़ या दहशतीमुळे पथकाने काही शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे टाळले़ गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची हानी होऊनही दबावामुळे पंचनामे झाले नाहीत़ याचा फटका चुंगीच्या ७५ शेतकर्‍यांना बसला आहे़ एकीकडे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणी धडपडतात तर चुंगीत विरोध करण्यात आला़ याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ शेतकर्‍यांनी या प्रकाराची माहिती दिली़ वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)