शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

उजनीच्या पाण्याला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:37 IST

सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील म्हणतात, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध ...

सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील म्हणतात, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर आमच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला.

परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ मध्ये मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटर वाढविली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जाऊ शकते, असा आरोप करीत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे. त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा, ही संपूर्ण जनतेची मागणी आहे. यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्यात यासाठीच केली आहे, परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या सोलापूर जिल्ह्यात मिळत आहेत.

उंची वाढविण्याची मागणी स्वागतार्ह

राजन पाटील यांनी दोन मीटर धरणाची उंची वाढविण्याची जी मागणी केली आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढविली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा अजून कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.

याबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.