शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील पोलीस अधिकाऱ्याने दिला प्रेमीयुगुलांना मायेचा आधार

By admin | Updated: June 24, 2017 12:19 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते, परंतु जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मायेचा आधार देत त्यांची रेशीमगाठ बांधण्यात चक्क अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची घटना नुकतीच वळसंग येथे घडली. एरव्ही नवरा-बायकोच्या भांडणाची प्रकरणे पोलीस ठाण्यात येतात. ती मिटवता-मिटवता पोलिसांच्या नाकीनऊ येते. शुक्रवारी मात्र वळसंग पोलीस ठाण्यात वेगळीच धावपळ सुरू होती. तणावग्रस्त माणसांची लगबग आणि गावातील प्रतिष्ठितांच्या सल्ला-मसलतीमुळे एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण गंभीर बनले होते. यावेळी निर्माण झालेल्या वातावरणाचा शेवट अत्यंत गोड झाला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय झाला अन् वातावरण निवळले. वळसंग येथील कुर्ले आणि कलशेट्टी कुटुंबातील युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात गर्क होते. अशातच तिचे लग्न कर्नाटकातील युवकाशी ठरले. पसंतीचा विचार न करता आई-वडिलांनी तिच्या लग्नाचा एकतर्फी निर्णय घेतला. लग्नाच्या आणा-भाका घेतलेल्या प्रियकराशी होणारा वियोग सहन न झाल्याने तिच्या मनात आत्महत्येचा विचार चमकून गेला. कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जाणारे वळसंगचे पोलीस अधिकारी इंद्रजित सोनकांबळे यांच्याशी तिने संपर्क साधला अन् आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, साहेब मला ठरलेले लग्न मान्य नाही. माझ्या मित्राशीच लग्न करेन नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तरुणीच्या या द्विधा मन:स्थितीत अधिकारी सोनकांबळे यांनी तिला आधार देण्याचा निर्धार केला. तिची सविस्तर माहिती घेतली. प्रियकराच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली. युवतीच्या आई-वडिलांसह वळसंगच्या प्रतिष्ठितांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. अधिकारी म्हणून नव्हे तर एका मुलीचा बाप म्हणून तिचा हट्ट पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी आहे, या भावनेने सपोनि सोनकांबळे यांनी दोन्ही कुटुंबीयांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रेमी युगुलाची रेशीमगाठ बांधण्याचा निर्णय झाला.-------------------------लग्नाला दिला होकारइकडे लग्न ठरलेल्या कर्नाटकातील युवकाशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यांनीही आनंदाने तिच्या लग्नाला होकार दिला. दिवसभर वळसंग पोलीस ठाण्यात हीच धावपळ होती. सपोनि इंद्रजित सोनकांबळे यांनी बजावलेली भूमिका ग्रामस्थांनाही प्रभावित करणारी ठरली.---------------केवळ वाद मिटविणे एवढेच पोलिसांचे काम नाही. सामाजिक भान राखून काही अनर्थ घडू नये, यासाठी कधी आई-वडिलांचीही भूमिका बजावावी लागते. मी तेच केले. दोन जीव एकत्र आले. त्याचा आनंद आहे. -इंद्रजित सोनकांबळेसपोनि, वळसंग पोलीस ठाणे