शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

सोलापूरातील पोलीस अधिकाऱ्याने दिला प्रेमीयुगुलांना मायेचा आधार

By admin | Updated: June 24, 2017 12:19 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते, परंतु जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मायेचा आधार देत त्यांची रेशीमगाठ बांधण्यात चक्क अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची घटना नुकतीच वळसंग येथे घडली. एरव्ही नवरा-बायकोच्या भांडणाची प्रकरणे पोलीस ठाण्यात येतात. ती मिटवता-मिटवता पोलिसांच्या नाकीनऊ येते. शुक्रवारी मात्र वळसंग पोलीस ठाण्यात वेगळीच धावपळ सुरू होती. तणावग्रस्त माणसांची लगबग आणि गावातील प्रतिष्ठितांच्या सल्ला-मसलतीमुळे एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण गंभीर बनले होते. यावेळी निर्माण झालेल्या वातावरणाचा शेवट अत्यंत गोड झाला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय झाला अन् वातावरण निवळले. वळसंग येथील कुर्ले आणि कलशेट्टी कुटुंबातील युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात गर्क होते. अशातच तिचे लग्न कर्नाटकातील युवकाशी ठरले. पसंतीचा विचार न करता आई-वडिलांनी तिच्या लग्नाचा एकतर्फी निर्णय घेतला. लग्नाच्या आणा-भाका घेतलेल्या प्रियकराशी होणारा वियोग सहन न झाल्याने तिच्या मनात आत्महत्येचा विचार चमकून गेला. कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जाणारे वळसंगचे पोलीस अधिकारी इंद्रजित सोनकांबळे यांच्याशी तिने संपर्क साधला अन् आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, साहेब मला ठरलेले लग्न मान्य नाही. माझ्या मित्राशीच लग्न करेन नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तरुणीच्या या द्विधा मन:स्थितीत अधिकारी सोनकांबळे यांनी तिला आधार देण्याचा निर्धार केला. तिची सविस्तर माहिती घेतली. प्रियकराच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली. युवतीच्या आई-वडिलांसह वळसंगच्या प्रतिष्ठितांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. अधिकारी म्हणून नव्हे तर एका मुलीचा बाप म्हणून तिचा हट्ट पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी आहे, या भावनेने सपोनि सोनकांबळे यांनी दोन्ही कुटुंबीयांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रेमी युगुलाची रेशीमगाठ बांधण्याचा निर्णय झाला.-------------------------लग्नाला दिला होकारइकडे लग्न ठरलेल्या कर्नाटकातील युवकाशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यांनीही आनंदाने तिच्या लग्नाला होकार दिला. दिवसभर वळसंग पोलीस ठाण्यात हीच धावपळ होती. सपोनि इंद्रजित सोनकांबळे यांनी बजावलेली भूमिका ग्रामस्थांनाही प्रभावित करणारी ठरली.---------------केवळ वाद मिटविणे एवढेच पोलिसांचे काम नाही. सामाजिक भान राखून काही अनर्थ घडू नये, यासाठी कधी आई-वडिलांचीही भूमिका बजावावी लागते. मी तेच केले. दोन जीव एकत्र आले. त्याचा आनंद आहे. -इंद्रजित सोनकांबळेसपोनि, वळसंग पोलीस ठाणे