शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सोलापूरातील पोलीस अधिकाऱ्याने दिला प्रेमीयुगुलांना मायेचा आधार

By admin | Updated: June 24, 2017 12:19 IST

-

 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते, परंतु जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मायेचा आधार देत त्यांची रेशीमगाठ बांधण्यात चक्क अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची घटना नुकतीच वळसंग येथे घडली. एरव्ही नवरा-बायकोच्या भांडणाची प्रकरणे पोलीस ठाण्यात येतात. ती मिटवता-मिटवता पोलिसांच्या नाकीनऊ येते. शुक्रवारी मात्र वळसंग पोलीस ठाण्यात वेगळीच धावपळ सुरू होती. तणावग्रस्त माणसांची लगबग आणि गावातील प्रतिष्ठितांच्या सल्ला-मसलतीमुळे एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण गंभीर बनले होते. यावेळी निर्माण झालेल्या वातावरणाचा शेवट अत्यंत गोड झाला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्या प्रेमीयुगुलाच्या लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय झाला अन् वातावरण निवळले. वळसंग येथील कुर्ले आणि कलशेट्टी कुटुंबातील युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात गर्क होते. अशातच तिचे लग्न कर्नाटकातील युवकाशी ठरले. पसंतीचा विचार न करता आई-वडिलांनी तिच्या लग्नाचा एकतर्फी निर्णय घेतला. लग्नाच्या आणा-भाका घेतलेल्या प्रियकराशी होणारा वियोग सहन न झाल्याने तिच्या मनात आत्महत्येचा विचार चमकून गेला. कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जाणारे वळसंगचे पोलीस अधिकारी इंद्रजित सोनकांबळे यांच्याशी तिने संपर्क साधला अन् आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, साहेब मला ठरलेले लग्न मान्य नाही. माझ्या मित्राशीच लग्न करेन नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तरुणीच्या या द्विधा मन:स्थितीत अधिकारी सोनकांबळे यांनी तिला आधार देण्याचा निर्धार केला. तिची सविस्तर माहिती घेतली. प्रियकराच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली. युवतीच्या आई-वडिलांसह वळसंगच्या प्रतिष्ठितांना पोलीस ठाण्यात पाचारण केले. अधिकारी म्हणून नव्हे तर एका मुलीचा बाप म्हणून तिचा हट्ट पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी आहे, या भावनेने सपोनि सोनकांबळे यांनी दोन्ही कुटुंबीयांमध्ये समन्वय घडवून आणला. प्रेमी युगुलाची रेशीमगाठ बांधण्याचा निर्णय झाला.-------------------------लग्नाला दिला होकारइकडे लग्न ठरलेल्या कर्नाटकातील युवकाशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली. त्यांनीही आनंदाने तिच्या लग्नाला होकार दिला. दिवसभर वळसंग पोलीस ठाण्यात हीच धावपळ होती. सपोनि इंद्रजित सोनकांबळे यांनी बजावलेली भूमिका ग्रामस्थांनाही प्रभावित करणारी ठरली.---------------केवळ वाद मिटविणे एवढेच पोलिसांचे काम नाही. सामाजिक भान राखून काही अनर्थ घडू नये, यासाठी कधी आई-वडिलांचीही भूमिका बजावावी लागते. मी तेच केले. दोन जीव एकत्र आले. त्याचा आनंद आहे. -इंद्रजित सोनकांबळेसपोनि, वळसंग पोलीस ठाणे