शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ग्रामीण भागातील यात्रांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

माळशिरस : ग्रामीण भागात यात्रा अथवा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. यात्रेबरोबरच अनेक जुन्या चालीरिती, परंपरा जोडलेल्या असतात. अशा ...

माळशिरस : ग्रामीण भागात यात्रा अथवा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. यात्रेबरोबरच अनेक जुन्या चालीरिती, परंपरा जोडलेल्या असतात. अशा ग्रामीण भागातील अनेक यात्रांना कोरोना महामारीमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. येत्या तीन महिन्यांत साजऱ्या होणाऱ्या यात्रा व उत्सवासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेला नोटीस बजावल्या आहेत.

यात्रेसाठी गर्दी झाल्यानंतर या यात्रांमधून ग्रामस्थांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी जत्रा थांबविण्याची गरज पुढे येत आहे. तालुक्यात कोरोना महामारी वाढत असून, रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये गावात होणारे उत्सव व यात्रा यासंदर्भात काटेकोर सूचना केल्या आहेत. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा यावर्षी होणार नाहीत. मात्र, दरवर्षीप्रमाणे पूजाअर्चा करण्याची परवानगी दिली जात आहे. इतर गर्दीच्या कार्यक्रमांवरही पोलिसांची करडी नजर आहे.

यात्रेला लागला ‘ब्रेक’

मार्च महिन्यात मोटेवाडी (मा) सिद्धनाथ यात्रा, उंबरे-दहिगाव महाशिवरात्री, पिलीव महालक्ष्मी यात्रा, एप्रिल महिन्यात फोंडशिरस महादेवाची यात्रा, जाधववाडी नाथ यात्रा, भांबुर्डी नाथ यात्रा, गोरडवाडी बिरोबा यात्रा, तरंगफळ श्रीनाथ यात्रा, माळशिरस, सदाशिवनगर, खडूस, पिलीव आदी गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तर मे महिन्यात मोटेवाडी येथे होणारी अहिल्यादेवी जयंती व शिंगोर्णी येथील महालक्ष्मी यात्रा अशा तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत १० ते १५ यात्रांना ‘ब्रेक’ लागला आहे.