शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

ग्रामीण भागातील यात्रांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:22 IST

माळशिरस : ग्रामीण भागात यात्रा अथवा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. यात्रेबरोबरच अनेक जुन्या चालीरिती, परंपरा जोडलेल्या असतात. अशा ...

माळशिरस : ग्रामीण भागात यात्रा अथवा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. यात्रेबरोबरच अनेक जुन्या चालीरिती, परंपरा जोडलेल्या असतात. अशा ग्रामीण भागातील अनेक यात्रांना कोरोना महामारीमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. येत्या तीन महिन्यांत साजऱ्या होणाऱ्या यात्रा व उत्सवासाठी पोलिसांनी संबंधित यंत्रणेला नोटीस बजावल्या आहेत.

यात्रेसाठी गर्दी झाल्यानंतर या यात्रांमधून ग्रामस्थांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी जत्रा थांबविण्याची गरज पुढे येत आहे. तालुक्यात कोरोना महामारी वाढत असून, रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे पोलिसांनी ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये गावात होणारे उत्सव व यात्रा यासंदर्भात काटेकोर सूचना केल्या आहेत. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा यावर्षी होणार नाहीत. मात्र, दरवर्षीप्रमाणे पूजाअर्चा करण्याची परवानगी दिली जात आहे. इतर गर्दीच्या कार्यक्रमांवरही पोलिसांची करडी नजर आहे.

यात्रेला लागला ‘ब्रेक’

मार्च महिन्यात मोटेवाडी (मा) सिद्धनाथ यात्रा, उंबरे-दहिगाव महाशिवरात्री, पिलीव महालक्ष्मी यात्रा, एप्रिल महिन्यात फोंडशिरस महादेवाची यात्रा, जाधववाडी नाथ यात्रा, भांबुर्डी नाथ यात्रा, गोरडवाडी बिरोबा यात्रा, तरंगफळ श्रीनाथ यात्रा, माळशिरस, सदाशिवनगर, खडूस, पिलीव आदी गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तर मे महिन्यात मोटेवाडी येथे होणारी अहिल्यादेवी जयंती व शिंगोर्णी येथील महालक्ष्मी यात्रा अशा तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत १० ते १५ यात्रांना ‘ब्रेक’ लागला आहे.