शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

अकलूजमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात

By admin | Updated: May 9, 2014 23:49 IST

अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भविष्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, ७ दिवस अगोदरच अकलूजमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुल्यबळ असणारे दोन्ही उमेदवार एकाच गावातील असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी दिली.

अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भविष्याचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, ७ दिवस अगोदरच अकलूजमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तुल्यबळ असणारे दोन्ही उमेदवार एकाच गावातील असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संजयकुमार पाटील यांनी दिली.येत्या १६ मे ला लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी होणार असून, या दिवशी अकलूज शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी दक्षता घेतली आहे. शहरात आजपासूनच २४ तास नाकाबंदी, वाहन तपासणी, बॅरेगेटींग लावण्यात आले आहेत. प्रत्येकी २० कमांडोंचा सहभाग असणारी दोन दंगानियंत्रक पथके, प्रत्येकी ९ कमांडोंचा सहभाग असणारी २ जलद प्रतिसाद पथके एके ४७ रायफ ल, रिव्हॉल्व्हर व इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अकलूज व परिसरातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. अकलूज पोलीस ठाण्याकडे असणारा सुमारे ७० पोलिसांचा स्टाफ या बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांच्या सोबत असणार आहे. शहरात रुट मार्च (ध्वज संचलन) करण्यात येणार आहे. शहरातील संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येऊन स्थानिक गुंड, अवैध धंदे, अवैध हत्यारे बाळगणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला.उमेदवारांच्या निकालाच्या दिवसापर्यंतची परिस्थिती पाहून पोलीस बंदोबस्तामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. या सर्व बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील, पो. नि. विश्वास साळोखे, अजय कदम व इतर ५ अधिकारी काम पाहणार आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख मकरंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची मिटींग बोलावण्यात येणार आहे. या मिटींगमध्ये दोन्ही उमेदवारांनाही निमंत्रित केले असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालावा, फ टाके, डीजे वाजवू नयेत, गुलाल उधळू नये, बॅनर लावू नयेत किंवा परिस्थिती चिघळेल अशी घोषणाबाजी करू नये अशी माहिती त्या मिटींगमध्ये देण्यात येणार आहे. बेकायदा जमाव जमवू नये, विजयी उमेदवाराने मिरवणूक काढू नये अशा सूचनाही देण्यात येणार आहेत. सध्या सोलापूर जिल्‘ात जिल्हाधिकार्‍यांकडून जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्या आदेशाची कोणीही पायमल्ली करू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी केले आहे.