शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

वैरागमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारल्यावरून पोलिसांचा लाठीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:24 IST

जमाव पोलीस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलीस निरीक्षक विनय बहीर व साहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी समजावून सांगितल्यानंतर तो ...

जमाव पोलीस ठाण्यासमोर आला तेव्हा पोलीस निरीक्षक विनय बहीर व साहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी समजावून सांगितल्यानंतर तो परत जात होता. तेव्हा अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामध्ये महिलांसह सुमारे १० जण जखमी झाले. यामुळे चिडलेल्या जमावाचा उद्रेक झाल्यावर पोलिसांकडून गोळ्या घालण्याची भाषा झाली, तेव्हा संतप्त जमावाने सुमारे दोन तास वाहतूक बंद केली होती.

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर हे घटनास्थळी दाखल झाल. तसेच वैराग, माढा, बार्शी शहर, बार्शी ग्रामीण व पांगरी येथील आठ पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह सुमारे १०० पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला. तसेेच नागरिकांनी शांतता पाळावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी केले.

यावेळी ‘गृहनिर्माण’चे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अरुण कापसे, वैरागचे प्रशासक एच. ए. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी भेटी देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

कोट ::::::

पुतळा बसविण्याची जागा ठरवायचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाचा आहे. आता तो ठेवायचा की काढायचा तोही निर्णय त्यांनीच घ्यावा.

- प्रदीप तहसीलदार,

तहसीलदार

कोट ::::::::::::

पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना घडलेल्या घटनेचा तपशील पाठविला आहे. समाजाताल प्रमुख नेत्यांना समजावून सांगितल्याने हा वाद थांबला आहे.

- अभिजित धाराशिवकर,

उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी

कोल्हापूरहून टेम्पोतून पहाटे आणला पुतळा

सदर पुतळा पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान कोल्हापूरहून मोहळमार्गे आयशर या मोठ्या टेम्पो ट्रकमधून आला. तसेत तो क्रेनच्या साहाय्याने गतवर्षी केलेल्या चबुतऱ्यावर चढवून मोठ्या प्रमाणात वेल्डिंग करून बसवला आहे. तरीदेखील गस्त घालणाऱ्या पोलिसांना याची खबरबात लागली नाही.

सदर नियोजित पुतळ्याची जागा २६ ऑक्टोबर २०१० रोजीच्या ठरावानुसार शिवस्मारक समितीला देण्यात आलेली आहे; परंतु स्थापनेची परवानगी नव्हती. मात्र नुकतीच समितीने शासनाकडे परवानगी मागितली आहे, असे ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना फोन अन् पुतळा काढण्याची प्रक्रिया थांबली

पोलीस ठाण्यामध्ये शहरातील प्रमुख नागरिकांबरोबर चर्चा करीत असताना पुतळा कोणी बसवला हे उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचारले. तेव्हा सर्वांनी ‘आम्ही नाही’ असे म्हटले. दरम्यान, शिवसेनेचे आंधळकर यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यानी बसवला असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे. कोणच तयार नसेल तर मी बसवला म्हणतो’, असे म्हणत भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. तेव्हा तत्काळ पुतळा काढण्याची प्रक्रिया थांबली.

फोटो

०८वैराग०१

वैराग येथील शिवाजी चौकात जमलेला जमाव

०८वैराग०२

नेत्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच पोलीस ठाण्यासमोर जमलेले कार्यकर्ते.

०८वैराग०३

वैराग येथील शिवाजी चौकात उभारलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा.