शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या आवर्तन स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

करमाळा : कुकडी पाणी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, म्हणजेच पाण्याचे आवर्तन सोडू नये, असा स्थगिती आदेश गुरुवारी ...

करमाळा : कुकडी पाणी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, म्हणजेच पाण्याचे आवर्तन सोडू नये, असा स्थगिती आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, अशी व्यथा मांडणारी हस्तक्षेप याचिका श्रीगोंदा येथील शेतकरी मारुती भापकर यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कालवा सल्लागार समितीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर दिलेली स्थगिती त्वरित उठवावी, माणसांना व जनावरांना पिण्यासाठी तसेच फळबाग शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे, शासनाची मंजुरी असणारी व केंद्रीय जल आयोगाची मान्यता असणारा डिभें- माणिकडोह हा १६ कि.मी.च्या जोड बोगद्याचे सुमारे ३०९ कोटींचे रेंगाळलेले काम त्वरित सुरू करावे, अशा मागण्या हस्तक्षेप याचिकेतून करण्यात आल्या आहेत.

सरकारने पाण्यासारख्या नाजूक व जीवनावश्यक विषयाबाबत अपारदर्शक व्यवहार केला, अचानक निर्णय घेतले तर त्यातून समन्यायी पाणी वाटपाबाबत मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाचे मुद्दे तयार होतात. त्यामुळे कोणत्याही तंत्रिकतेत न अडकता पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी उच्च न्यायालयात केली असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

हस्तक्षेप याचिकेवर मुख्य याचिकेसोबतच सुनावणी घेतली जाईल, अशी माहिती सहकारी वकील अ‍ॅड अजिंक्य उडाणे यांनी दिली.

---

१५ टीएमसी पाणी कुठे गेले?

अत्यंत महत्त्वाची माहिती दडवून, वास्तविक परिस्थितीबाबत न्यायालयाची दिशाभूल करून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यावर आणलेली स्थगिती ही क्रूर चेष्टा आहे. तीन आवर्तनांमध्ये वर्षभरात २० टीएमसी पाणी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी सोडावे असे असताना केवळ एकच आवर्तन का सोडण्यात आले? केवळ ५ टीएमसी इतकेच पाणी का देण्यात आले? या चार तालुक्यातील लोकांच्या हक्काचे १५ टीएमसी पाणी कुठे गेले? असे नेमके प्रश्न याचिकाकर्ते मारुती भापकर यांनी उपस्थित केले आहेत.