शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सोसायट्यांची कर्ज भरा.. थेट बँकेतून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

तालुक्यात अनेक कर्जदार शेतकरी कर्ज भरण्यास सक्षम असूनही कर्जमाफीच्या आशापोटी थकित राहत आहेत. यामुळे संस्था आर्थिक डबघाईला आल्या आहेत. ...

तालुक्यात अनेक कर्जदार शेतकरी कर्ज भरण्यास सक्षम असूनही कर्जमाफीच्या आशापोटी थकित राहत आहेत. यामुळे संस्था आर्थिक डबघाईला आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असलेल्या गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी पाच दशकाहून अधिक काळ मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र अलीकडील काळात थकित कर्जामुळे बँका आणि शेतकरीही अडचणीत आले आहेत.

शासनाने घेतलेले कर्ज भरण्यास सक्षम नसणाऱ्यांसाठी वारंवार कर्जमाफीची योजना आणूनही त्याचा विपरित परिणाम प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यावर झाला आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळालेले नाहीत. यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले थकित कर्ज भरल्यास आणि विविध कार्यकारी सोसायटीचे नो ड्यूज प्रमाणपत्र बँकांना दिल्यास थेट कर्ज मिळू शकते, असे बँकांकडून सांगण्यात येत आहे.

.. तर कर्ज मिळण्यास मार्ग मोकळा

शासनाने बँकेचे व्यवहार सुरळीत असणाऱ्यांसाठी तान लाखांपर्यंत नुकताच बिनव्याजी कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी हंजगी, खानापूर, म्हैसलगे केवळ या तीन सोसायट्या वगळता उर्वरित ८६ संस्था अपात्र आहेत. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळणे अशक्य आहे. थकित कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे.

----

संस्था अन्‌ गरजू शेतकऱ्यांना मिळेल दिलासा

तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेशी ८९ संलग्न विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज थकीत ठेवल्यामुळे आज केवळ तीन सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून नव्याने घेतल्यास संस्था व गरजू शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता शेतकऱ्यांनी सोसायट्यांचे कर्ज भरून थेट बँकेकडून कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे वरिष्ठ बँक निरीक्षक राजकुमार तेलुणगी यांनी दिली.