शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

शेतकऱ्यांची ऊसबिले, कामगारांचे पगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

विठ्ठल कारखान्याचा २०२०-२१ गळीत हंगाम २२ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झालेला आहे. ...

विठ्ठल कारखान्याचा २०२०-२१ गळीत हंगाम २२ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झालेला आहे. या हंगामात गळितास आलेल्या उसाच्या बिलाचे पेमेंट २० डिसेंबर २०२० पर्यंत २०५० रुपयेप्रमाणे वाटप केले आहे.

२१ डिसेंबर २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ अखेरील ३९ कोटी रुपयांचे ऊसबिल अद्याप दिलेले नाही. तसेच कामगारांचे ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ असे एकूण १७ महिन्यांचे पगार व इतर देणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम पेमेंट देणे बाकी आहे.

तसेच ऊसतोडणी वाहतुकीचे मागील व चालू हंगामातील पेमेंटही देणे बाकी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये व पंढरपूर तालुक्यामध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सभासद, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार हे स्वत: व त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या औषध उपचारासाठी, शेतीच्या व इतर कामासाठी पैशाची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष भेटून वारंवार ऊसबिलाबाबत, पगाराबाबत विचारणा करीत आहेत. आपण या बाबींचा गांभीर्याने विचार करून सभासद, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार यांना लवकरात लवकर पेमेंट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युवराज पाटील यांनी केली आहे.

भालकेंच्या अडचणीत वाढ

आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी युवराज पाटील व सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्यामध्ये अध्यक्षपदावरून तू तू मै मै झाली होती. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांची समजूत काढून मनोमिलन घडवलेे; परंतु पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांचा पराभव झाला. यानंतर काही महिन्यात विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागणार आहे. शेतकऱ्यांचे ऊसबिल, पगार व अन्य मुद्द्यावरून विरोधक भगीरथ भालके यांना टार्गेट करत होते. परंतु आता विठ्ठल परिवारातील नेते, संचालक भालके यांना जाब विचारू लागले आहेत. यामुळे भालके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत असल्याची चर्चा आहे.

कोट

कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्यास कारखान्याचे कामगार, सभासद यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहे.

- युवराज पाटील,

संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना