शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

शेतकऱ्यांची ऊसबिले, कामगारांचे पगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:23 IST

विठ्ठल कारखान्याचा २०२०-२१ गळीत हंगाम २२ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झालेला आहे. ...

विठ्ठल कारखान्याचा २०२०-२१ गळीत हंगाम २२ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झालेला आहे. या हंगामात गळितास आलेल्या उसाच्या बिलाचे पेमेंट २० डिसेंबर २०२० पर्यंत २०५० रुपयेप्रमाणे वाटप केले आहे.

२१ डिसेंबर २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ अखेरील ३९ कोटी रुपयांचे ऊसबिल अद्याप दिलेले नाही. तसेच कामगारांचे ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ असे एकूण १७ महिन्यांचे पगार व इतर देणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम पेमेंट देणे बाकी आहे.

तसेच ऊसतोडणी वाहतुकीचे मागील व चालू हंगामातील पेमेंटही देणे बाकी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये व पंढरपूर तालुक्यामध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सभासद, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार हे स्वत: व त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या औषध उपचारासाठी, शेतीच्या व इतर कामासाठी पैशाची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष भेटून वारंवार ऊसबिलाबाबत, पगाराबाबत विचारणा करीत आहेत. आपण या बाबींचा गांभीर्याने विचार करून सभासद, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार यांना लवकरात लवकर पेमेंट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युवराज पाटील यांनी केली आहे.

भालकेंच्या अडचणीत वाढ

आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी युवराज पाटील व सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्यामध्ये अध्यक्षपदावरून तू तू मै मै झाली होती. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांची समजूत काढून मनोमिलन घडवलेे; परंतु पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांचा पराभव झाला. यानंतर काही महिन्यात विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागणार आहे. शेतकऱ्यांचे ऊसबिल, पगार व अन्य मुद्द्यावरून विरोधक भगीरथ भालके यांना टार्गेट करत होते. परंतु आता विठ्ठल परिवारातील नेते, संचालक भालके यांना जाब विचारू लागले आहेत. यामुळे भालके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत असल्याची चर्चा आहे.

कोट

कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्यास कारखान्याचे कामगार, सभासद यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहे.

- युवराज पाटील,

संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना