शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष राहिले बाजूला; स्थानिक आघाड्यांना आले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल ...

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. यामध्ये ग्रामस्तरावर आपलेच नेतृत्व किती सक्षम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न गावागावामध्ये सुरू आहे. सध्या माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ४२ गावांमध्ये आ. बबनराव शिंदे यांनी माझ्या नावावर निवडणुका लढवू नका, असे सांगूनही काही ठिकाणी त्यांच्या नावावर काही कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असल्याचे चित्र आहे. याशिवाय स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना, विविध पक्षाचे तालुका, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या करून एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.

पक्ष-गटांना तिलांजली

तालुक्यात प्रमुख दोन-तीन गट आहेत. याशिवाय विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, प्रमुख राजकीय पक्षात काम करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढविताना कोण कोणत्या गटाचा, कोण कोणत्या पक्षाचे काम करत आहे, हे न पाहता गावातील आपल्या विरोधकाचा काटा काढायचा, या एकाच उद्देशाने, भाव-भावकी, पाहुणे-रावळे याची समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या मजबूत झाल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रमुख पक्ष, गटा-तटांना तिलांजली दिल्याचे दिसत आहे.