शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

पक्ष राहिले बाजूला; स्थानिक आघाड्यांना आले महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल ...

अनेक गावांमध्ये स्व. आ. भालके, आ. परिचारक यांचेच दोन-दोन गट, सोबत काळे, विविध संघटना यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. यामध्ये ग्रामस्तरावर आपलेच नेतृत्व किती सक्षम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न गावागावामध्ये सुरू आहे. सध्या माढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ४२ गावांमध्ये आ. बबनराव शिंदे यांनी माझ्या नावावर निवडणुका लढवू नका, असे सांगूनही काही ठिकाणी त्यांच्या नावावर काही कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असल्याचे चित्र आहे. याशिवाय स्वाभिमानी, बळीराजा शेतकरी संघटना, विविध पक्षाचे तालुका, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या करून एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.

पक्ष-गटांना तिलांजली

तालुक्यात प्रमुख दोन-तीन गट आहेत. याशिवाय विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, प्रमुख राजकीय पक्षात काम करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लढविताना कोण कोणत्या गटाचा, कोण कोणत्या पक्षाचे काम करत आहे, हे न पाहता गावातील आपल्या विरोधकाचा काटा काढायचा, या एकाच उद्देशाने, भाव-भावकी, पाहुणे-रावळे याची समीकरणे जुळवत स्थानिक आघाड्या मजबूत झाल्याचे दिसत आहे. यामध्ये प्रमुख पक्ष, गटा-तटांना तिलांजली दिल्याचे दिसत आहे.