शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज काढताना पॅनलप्रमुखांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

प्रत्येक अटी मान्य करूनही अनेक जण अर्ज काढण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे ...

प्रत्येक अटी मान्य करूनही अनेक जण अर्ज काढण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३१६६ उमेदवारांनी ३३३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये छाननीत ३३ उमेदवारांचे अर्ज बाद करत त्यांना अपात्र ठरविले होते. अनेक गावांमध्ये दोन किंवा तीन पॅनल असले तरी त्यापेक्षा पूरक, अपक्ष असे तिप्पट अर्ज दाखल झाले होते. ते अर्ज काढण्यासाठी सोमवारी शेवटच्या दिवशी अनेक गावांतील पॅनलप्रमुखांची धडपड सुरू होती. पूरक अर्ज भरलेले व अपक्ष इच्छुक उमेदवारांचे अर्ज काढण्यासाठी तहसीलच्या आवारातच नाराजांची मनधरणी सुरू होती.

अनेक जण अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन मला अर्ज काढायचाच नाही म्हणत तेथून पळत काढत असल्याने अनेकांची धावपळ झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक जणांना धरून अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे काम काही कार्यकर्ते करत होते. काही इच्छुकांनी अर्ज काढले, मात्र त्यांच्या अनेक अटी घालूनच. अटी उद्या पाळो न पाळो, मात्र काही ठिकाणच्या उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावण्यास पॅनलप्रमुख यशस्वी झाल्याचे चित्र दिसले.

चिन्हांसाठी अधिकाऱ्यांसमोर रंगले वाद

दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कायदेशीर बाबी पूर्ण करून चिन्हांचे वाटप सुरू झाले. मात्र प्रत्येक गावातील पॅनलप्रमुखांनी कपबशी, शिट्टी, बॅटरी, नारळ अशा महत्त्वाच्या चिन्हांचीच मागणी केली. मात्र ज्यांचे उमेदवारी अर्ज प्रथम दाखल झाले आहेत, त्यांनाच चिन्हांचे वाटप करताना प्रथम प्राधान्य अशी भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र आमच्या पसंतीची चिन्हे आम्हालाच मिळाली पाहिजेत यासाठी अनेक पॅनलप्रमुख, इच्छुक उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.

-----