शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

अर्ज काढताना पॅनलप्रमुखांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:09 IST

प्रत्येक अटी मान्य करूनही अनेक जण अर्ज काढण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे ...

प्रत्येक अटी मान्य करूनही अनेक जण अर्ज काढण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३१६६ उमेदवारांनी ३३३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये छाननीत ३३ उमेदवारांचे अर्ज बाद करत त्यांना अपात्र ठरविले होते. अनेक गावांमध्ये दोन किंवा तीन पॅनल असले तरी त्यापेक्षा पूरक, अपक्ष असे तिप्पट अर्ज दाखल झाले होते. ते अर्ज काढण्यासाठी सोमवारी शेवटच्या दिवशी अनेक गावांतील पॅनलप्रमुखांची धडपड सुरू होती. पूरक अर्ज भरलेले व अपक्ष इच्छुक उमेदवारांचे अर्ज काढण्यासाठी तहसीलच्या आवारातच नाराजांची मनधरणी सुरू होती.

अनेक जण अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन मला अर्ज काढायचाच नाही म्हणत तेथून पळत काढत असल्याने अनेकांची धावपळ झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक जणांना धरून अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे काम काही कार्यकर्ते करत होते. काही इच्छुकांनी अर्ज काढले, मात्र त्यांच्या अनेक अटी घालूनच. अटी उद्या पाळो न पाळो, मात्र काही ठिकाणच्या उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावण्यास पॅनलप्रमुख यशस्वी झाल्याचे चित्र दिसले.

चिन्हांसाठी अधिकाऱ्यांसमोर रंगले वाद

दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कायदेशीर बाबी पूर्ण करून चिन्हांचे वाटप सुरू झाले. मात्र प्रत्येक गावातील पॅनलप्रमुखांनी कपबशी, शिट्टी, बॅटरी, नारळ अशा महत्त्वाच्या चिन्हांचीच मागणी केली. मात्र ज्यांचे उमेदवारी अर्ज प्रथम दाखल झाले आहेत, त्यांनाच चिन्हांचे वाटप करताना प्रथम प्राधान्य अशी भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र आमच्या पसंतीची चिन्हे आम्हालाच मिळाली पाहिजेत यासाठी अनेक पॅनलप्रमुख, इच्छुक उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.

-----