शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

किमान सातवी पास उमेदवारासाठी पॅनलप्रमुखांची उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशामुळे गावा-गावातील राजकीय गणितं पूर्णतः बिघडले आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता ...

राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशामुळे गावा-गावातील राजकीय गणितं पूर्णतः बिघडले आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रवर्गातील उमेदवार किमान सातवी पास द्यावा लागणार असल्याने पॅनल प्रमुखांची धावपळ उडाली आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतेवेळी या पदासाठी किमान सातवी पासची अट अनिवार्य केली होती. आता सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याची पद्धत रद्द केली आहे. त्याऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी पूर्वीची सातवी पासची अट आतासुद्धा कायम ठेवली आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाकडून काढले आहेत.

सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल याची पूर्वकल्पना नसल्याने, प्रत्येक प्रवर्गासाठी ऐनवेळी सातवी पास उमेदवार शोधणे कठीण झाले आहे.

अचानक जाहीर झालेल्या अध्यादेशामुळे गावांमधील राजकीय समीकरण पूर्णत: बिघडले आहे. अनेक गावांना याची कल्पना नसल्यामुळे ऐनवेळी इच्छुक उमेदवारांची पंचाईत झाली आहे. निवडणूक अर्ज सादर करताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचं नाव मतदार यादीत असावे,

उमेदवार जर १ जानेवारी १९८५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल, असा उमेदवार सातवी पास असल्याशिवाय त्याला सरपंच करता येणार नाही.