शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

किमान सातवी पास उमेदवारासाठी पॅनलप्रमुखांची उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशामुळे गावा-गावातील राजकीय गणितं पूर्णतः बिघडले आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता ...

राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशामुळे गावा-गावातील राजकीय गणितं पूर्णतः बिघडले आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्यात येणार असल्याने आता प्रत्येक प्रवर्गातील उमेदवार किमान सातवी पास द्यावा लागणार असल्याने पॅनल प्रमुखांची धावपळ उडाली आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाने सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतेवेळी या पदासाठी किमान सातवी पासची अट अनिवार्य केली होती. आता सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याची पद्धत रद्द केली आहे. त्याऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी पूर्वीची सातवी पासची अट आतासुद्धा कायम ठेवली आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाकडून काढले आहेत.

सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल याची पूर्वकल्पना नसल्याने, प्रत्येक प्रवर्गासाठी ऐनवेळी सातवी पास उमेदवार शोधणे कठीण झाले आहे.

अचानक जाहीर झालेल्या अध्यादेशामुळे गावांमधील राजकीय समीकरण पूर्णत: बिघडले आहे. अनेक गावांना याची कल्पना नसल्यामुळे ऐनवेळी इच्छुक उमेदवारांची पंचाईत झाली आहे. निवडणूक अर्ज सादर करताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचं नाव मतदार यादीत असावे,

उमेदवार जर १ जानेवारी १९८५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल, असा उमेदवार सातवी पास असल्याशिवाय त्याला सरपंच करता येणार नाही.