शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सर्वाधिक साखर उतारा राखून जिल्ह्यात ‘पांडुरंग’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

पांडुरंग कारखाना जवळपास दैनंदिन ६७०० मे.टन उसाचे गाळप करीत आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात पूर्णवेळ कारखाना चालवून १० लाख ...

पांडुरंग कारखाना जवळपास दैनंदिन ६७०० मे.टन उसाचे गाळप करीत आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात पूर्णवेळ कारखाना चालवून १० लाख मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे स्वप्न पांडुरंग साखर कारखान्याकडून खऱ्या अर्थाने साकार होत आहे. गाळपास आलेल्या उसाचे एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा केले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

पुढील वर्षीही ‘पांडुरंग’ची एफआरपी सर्वाधिक

गत व चालू हंगामात जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा ‘पांडुरंग’चा साखर उतारा सर्वाधिक होता. त्यामुळे एफआरपी सर्वांत जास्त आहे. चालू गळीत हंगामात कोणत्याही परिस्थितीत गाळप हंगामात खंड पडू नये म्हणून संचालक मंडळाने व व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे. म्हणूनच ‘पाडुरंग’चा साखर उतारा यावर्षी जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक ११.४५ आहे. यामुळे पुढच्या वर्षी जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा पाडुरंग कारखान्याची एफआरपी सर्वांत जास्त राहणार आहे. याचा ऊस उत्पादकांना फायदा होऊन अधिक दर मिळणार आहे.

कोट :::::::::::::::::::

पांडुरंग कारखान्याची यंत्रसामग्री कार्यक्षम करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे गाळप हंगामात खंड न पडता प्रतिदिनी ६७०० मे. टन उसाचे गाळप होत आहे. आजअखेर दहा लाख मे. टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले. तोडणी प्रोग्रामचे काटेकोर पालन केल्याने उच्चांकी साखर उतारा मिळाला आहे.

- डॉ. यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक