शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

माघी एकादशीनिमित्त पंढरी दुमदुमली

By admin | Updated: February 7, 2017 16:18 IST

माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ -  माघ एकादशीनिमित्त सावळ्या विठूरायांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरी दुमदुमून गेली आहे. पहाटेपासून विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़  
विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत  माघी एकादशी निमित्त प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार विलास महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.
माघी एकादशीच्या नित्यपूजेस जिल्हाधिकारी तथा मंदीर समितीचे सभापती रणजीतकुमार, सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतुल कुलकर्णी, शहर पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह मंदीर समितीचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. 
पंढरपुरात येणारा भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात आहेत. दर्शनरांगेत सहभागी होऊन अतिशय शांततेने विठूमाऊलीचा आणि ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत पददर्शनासाठी हळूहळू पावले टाकत पुढेपुढे सरकत आहेत़
सकाळपासूनच मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रस्ता, चौक ही ठिकाणांवरून वारकरी दर्शनासाठी मंदिर मार्गावर गर्दी केली आहे़ संत गजानन महाराज मठ, संत तनपुरे महाराज मठ, संत कैकाडी महाराज मठ यासह अन्य मठातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे़ मठ, धर्मशाळा, आश्रमशाळेत भजन, प्रवचन, किर्तनाचे सूर अजुनही आळवले जात आहेत़ एकूनच पंढरपूरात माघवारीनिमित्त पंढरी भक्तीमय झाली आहे़ काही वारकरी दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर लागली आहेत़ यात्रेमुळे एसटी विभागानेही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
 
जिल्हा प्रशासनाचे ग्रेट वर्क
माघवारीनिमित्त पंढरपूरात येणाºया भाविकांचे हाल होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील टिमने नेटके नियोजन केले. दर्शन रांगेत गर्दी होणार याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू याच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोणत्याही वारक-यांची गैरसोय होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासन व ग्रामीण पोलीस प्रशासन काम करीत आहे.