शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

पंढरपूर तालुका: तिन्ही प्रादेशिक योजना बंद;

By admin | Updated: May 10, 2014 23:59 IST

नदीचे पाणी पिण्यास अयोग्य हातपंप, खासगी विहिरींवरच पाणीटंचाईची भिस्त

 

 पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुन्हा बंद पडल्या असून, भीमा नदी पात्रातील पाणी बंधार्‍यात अडविल्याने दूषित बनले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील १०५ गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त हातपंप, खाजगी विंधन विहिरी व ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांवरच राहणार आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींतर्फे कारभार चालविल्या जाणार्‍या १०५ गावांना भीमा नदी, माण नदी हे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असून उजनी व नीरा उजवा कालव्यांच्या फाट्यांबरोबरच सोनके तलावातूनही तालुक्यातील काही गावांची तहान भागविली जाते. भीमा नदीवर तालुक्यातील आवे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळूज आदी ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्यात आल्याने हे पाणी पिण्यायोग्य रहात नाही. तर नदीकाठच्या बहुतेक गावांतील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना देखरेखीअभावी बंद पडल्याने या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एकतर हातपंप, खाजगी विंधन विहिरी अथवा खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागतो. तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना सोनके तलावातूनही पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या भाळवणी, खर्डी, कासेगाव या तिन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टंचाई आराखड्यातून तात्पुरत्या निधीची तरतूद करून चालविण्यात आल्या होत्या. मात्र यंदा या योजना पुन्हा बंद पडल्याने या योजनेतील गावांवर पाणीटंचाईची कुºहाड कोसळणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी शासनाने १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के निर्मलग्रामची अट घातल्याने नवीन योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायती धजावत नाहीत. या जाचक अटींमुळे काही गावच्या पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत.

-------------------------------

दृष्टिक्षेप तालुका ४ एकूण गावे - १०५ (९४ ग्रामपंचायती) ४ लोकसंख्या - ३ लाख ४३ हजार ४४५ ४ टॅँकरची मागणी - ८ (सध्या एकही टॅँकर चालू नाही) ४ तहानलेली गावे-१२ (बार्डी, करकंब, सिद्धेवाडी, खर्डी, भटुंबरे-विसावा, वाखरी, तुंगत, नारायण-चिंचोली, खरातवाडी, सोनके, कासेगाव, तारापूर) ४ एकूण हातपंप - १५५८ ४ अधिगृहीत खाजगी विहिरी/विंधन विहिरी - ८ ४ नवीन विंधन विहिरी - १० ४ पाण्याचे स्त्रोत- भीमा नदी, माण नदी, उजनी व नीरा उजवा कालवा, विहिरी, विंधन विहिरी, सोनके तलाव.

------------------------------

टंचाईग्रस्त आराखडा योजनेतून १० ठिकाणी हातपंप सुचविण्यात आले होते. मात्र भूजल सर्वेक्षण खात्याने ४ ठिकाणी शिफारस केल्याने ४ प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत. पाणीटंचाई कालावधीत मागणीनुसार टॅँकर देण्याची तरतूद करण्यात येईल. - एम. एन. सरवदे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा