शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पंढरपूर तालुका: तिन्ही प्रादेशिक योजना बंद; नदीचे पाणी पिण्यास अयोग्य हातपंप,

By admin | Updated: May 11, 2014 00:14 IST

खासगी विहिरींवरच पाणीटंचाईची भिस्त

 पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुन्हा बंद पडल्या असून, भीमा नदी पात्रातील पाणी बंधार्‍यात अडविल्याने दूषित बनले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील १०५ गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त हातपंप, खाजगी विंधन विहिरी व ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांवरच राहणार आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींतर्फे कारभार चालविल्या जाणार्‍या १०५ गावांना भीमा नदी, माण नदी हे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असून उजनी व नीरा उजवा कालव्यांच्या फाट्यांबरोबरच सोनके तलावातूनही तालुक्यातील काही गावांची तहान भागविली जाते. भीमा नदीवर तालुक्यातील आवे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळूज आदी ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्यात आल्याने हे पाणी पिण्यायोग्य रहात नाही. तर नदीकाठच्या बहुतेक गावांतील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना देखरेखीअभावी बंद पडल्याने या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एकतर हातपंप, खाजगी विंधन विहिरी अथवा खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागतो. तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना सोनके तलावातूनही पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या भाळवणी, खर्डी, कासेगाव या तिन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टंचाई आराखड्यातून तात्पुरत्या निधीची तरतूद करून चालविण्यात आल्या होत्या. मात्र यंदा या योजना पुन्हा बंद पडल्याने या योजनेतील गावांवर पाणीटंचाईची कुºहाड कोसळणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी शासनाने १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के निर्मलग्रामची अट घातल्याने नवीन योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायती धजावत नाहीत. या जाचक अटींमुळे काही गावच्या पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत.

-------------------------------

दृष्टिक्षेप तालुका ४ एकूण गावे - १०५ (९४ ग्रामपंचायती) ४ लोकसंख्या - ३ लाख ४३ हजार ४४५ ४ टॅँकरची मागणी - ८ (सध्या एकही टॅँकर चालू नाही) ४ तहानलेली गावे-१२ (बार्डी, करकंब, सिद्धेवाडी, खर्डी, भटुंबरे-विसावा, वाखरी, तुंगत, नारायण-चिंचोली, खरातवाडी, सोनके, कासेगाव, तारापूर) ४ एकूण हातपंप - १५५८ ४ अधिगृहीत खाजगी विहिरी/विंधन विहिरी - ८ ४ नवीन विंधन विहिरी - १० ४ पाण्याचे स्त्रोत- भीमा नदी, माण नदी, उजनी व नीरा उजवा कालवा, विहिरी, विंधन विहिरी, सोनके तलाव.

------------------------------

टंचाईग्रस्त आराखडा योजनेतून १० ठिकाणी हातपंप सुचविण्यात आले होते. मात्र भूजल सर्वेक्षण खात्याने ४ ठिकाणी शिफारस केल्याने ४ प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत. पाणीटंचाई कालावधीत मागणीनुसार टॅँकर देण्याची तरतूद करण्यात येईल. - एम. एन. सरवदे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा