शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

विठूमाऊलीच्या भेटीसाठी पालखीमार्ग आसुसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन ...

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन घ्यावे लागते. वर्षानुवर्षे सवय झालेल्या पालखीमार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श झाला नाही. वारकऱ्यांसह पालखीमार्गही विठू माऊलीच्या भेटी आसुसला आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात पालखीमार्गावरील गावोगावच्या कारभाऱ्यांनी ‘यंदा वारी व्हायलाच पाहिजे’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुवारी यात्रेच्यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्येे यात्रेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. काेरोना संसर्गजन्य आजारामुळे गतवर्षी आषाढी यात्रेचा पालखी सोहळा प्राथमिक स्वरुपात साजरा झाला. शासनाच्या आदेशाने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या संतांच्या पालख्या एस. टी. ने पंढरपूरला आणल्या गेल्या. मंदिरात देखील मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. प्राथमिक स्वरुपात आषाढी यात्रा सोहळा करून परंपरा खंडित होऊ दिली नव्हती. यंदा मात्र आषाढी सोहळा व्हायला हवा, अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सध्या कोरोनाचे संकट कमी होताना दिसून येत आहे. यामुळे यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या संताच्या पालख्या यंदा एस. टी. बसने पंढरपुरात न आणता. मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित पायी आणण्यास परवानगी मिळावी, ही पायी यात्रेची परंपरा अखंडित ठेवावी, अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. आषाढी यात्रा कसा साजरी करायचा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंदिर समितीकडून जिल्हाधिकारी व शासनाकडे यात्रेसंदर्भातील सूचना जाणार आहेत. यामुळे मंदिर समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----

पालखी सोहळा वृद्धांसाठी मोठा उत्साही स्रोत आहे. गतवर्षी महामारीमुळे पालखी सोहळा पायी थांबविल्याने मोठ्या परंपरेच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, यावर्षी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पायी पालखी सोहळ्याची परंपरा यावर्षी जपण्याची आवश्यकता आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मापुरी.

----

सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामाचा मान नातेपुते शहराचा असतो. शेकडो भाविकांना या सोहळ्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा असते. मात्र, यावर्षी लसीकरण व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आषाढी पायी वारी व्हावी.

- बी. वाय. राऊत, माजी सरपंच नातेपुते.

---

पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगणाचा मान पुरंदावडे रिंगण सोहळ्याला मिळत होता. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांची वर्दळ असते. याशिवाय त्यामुळे शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या भाविकांचा शिणवटा जाऊन प्रचंड ऊर्जास्रोत म्हणून पाहिले जाते. ही परंपरा कोरनामुळे थांबली आहे. यंदा ही वारी होणे आवश्यक वाटते.

- देवीदास ढाेपे, सरपंच पुरंदावडे.

----

वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. पालखी महामार्गावरील ग्रामपंचायतीचे दोन वर्षांचे अनुदान शासनाकडे थकले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता व्हावी ही अपेक्षा आहे.

- शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच, अकलूज.

---

कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळा चालत होणे गरजेचे आहे.

- विमलताई जानकर, सरपंच, वेळापूर

---

भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे पालखीचा मुक्काम असतो. भंडीशेगाव व वाखरीजवळ गोल रिंगण होते. हा सोहळा गतवर्षी पाहायला मिळाला नाही. कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण कमी झाले तर आषाढी यात्रेचा सोहळा मोजक्या भाविकांत होण्यास काही हरकत नाही.

- मनीषा यलमार, सरपंच, भंडीशेगाव.

----

कमी लोकांमध्ये का होईना सोहळा व्हावा

गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते; परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे सोशल अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यासह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यावी. पालखी सोहळे गावापासून दोन ते तीन किलोमीटर थांबले तरी गर्दी होणार नाही, अशा भावना पंढपूरच्या आंबेकर-आजरेकर फडाचे मठाधीपती ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांनी व्यक्त केल्या.

----

मानाच्या पालख्यांना पायी यात्रा करु द्या!

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. आषाढी यात्रेनिमित्त मानाच्या सात पालख्यांना मोजक्या संख्येत पायी यात्रा करू द्यावा, अशी मागणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर महाराजांनी केली आहे.

----