शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विठूमाऊलीच्या भेटीसाठी पालखीमार्ग आसुसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन ...

पंढरपूर : कोरोना महामारीमुळं गतवर्षीही आषाढीसह चारही यात्रासोहळे पार पडले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना घरीच बसून पांडुरंगाचे मनोमन दर्शन घ्यावे लागते. वर्षानुवर्षे सवय झालेल्या पालखीमार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श झाला नाही. वारकऱ्यांसह पालखीमार्गही विठू माऊलीच्या भेटी आसुसला आहे. लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात पालखीमार्गावरील गावोगावच्या कारभाऱ्यांनी ‘यंदा वारी व्हायलाच पाहिजे’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुवारी यात्रेच्यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्येे यात्रेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. काेरोना संसर्गजन्य आजारामुळे गतवर्षी आषाढी यात्रेचा पालखी सोहळा प्राथमिक स्वरुपात साजरा झाला. शासनाच्या आदेशाने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या संतांच्या पालख्या एस. टी. ने पंढरपूरला आणल्या गेल्या. मंदिरात देखील मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. प्राथमिक स्वरुपात आषाढी यात्रा सोहळा करून परंपरा खंडित होऊ दिली नव्हती. यंदा मात्र आषाढी सोहळा व्हायला हवा, अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सध्या कोरोनाचे संकट कमी होताना दिसून येत आहे. यामुळे यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी मानाच्या संताच्या पालख्या यंदा एस. टी. बसने पंढरपुरात न आणता. मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थित पायी आणण्यास परवानगी मिळावी, ही पायी यात्रेची परंपरा अखंडित ठेवावी, अशी मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. आषाढी यात्रा कसा साजरी करायचा, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी गुरुवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंदिर समितीकडून जिल्हाधिकारी व शासनाकडे यात्रेसंदर्भातील सूचना जाणार आहेत. यामुळे मंदिर समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

----

पालखी सोहळा वृद्धांसाठी मोठा उत्साही स्रोत आहे. गतवर्षी महामारीमुळे पालखी सोहळा पायी थांबविल्याने मोठ्या परंपरेच्या आनंदावर विरजण पडले. मात्र, यावर्षी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून पायी पालखी सोहळ्याची परंपरा यावर्षी जपण्याची आवश्यकता आहे.

- बाजीराव काटकर, सरपंच धर्मापुरी.

----

सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामाचा मान नातेपुते शहराचा असतो. शेकडो भाविकांना या सोहळ्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षा असते. मात्र, यावर्षी लसीकरण व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आषाढी पायी वारी व्हावी.

- बी. वाय. राऊत, माजी सरपंच नातेपुते.

---

पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगणाचा मान पुरंदावडे रिंगण सोहळ्याला मिळत होता. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांची वर्दळ असते. याशिवाय त्यामुळे शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या भाविकांचा शिणवटा जाऊन प्रचंड ऊर्जास्रोत म्हणून पाहिले जाते. ही परंपरा कोरनामुळे थांबली आहे. यंदा ही वारी होणे आवश्यक वाटते.

- देवीदास ढाेपे, सरपंच पुरंदावडे.

----

वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. पालखी महामार्गावरील ग्रामपंचायतीचे दोन वर्षांचे अनुदान शासनाकडे थकले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता व्हावी ही अपेक्षा आहे.

- शिवतेजसिंह मोहिते पाटील, उपसरपंच, अकलूज.

---

कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळा चालत होणे गरजेचे आहे.

- विमलताई जानकर, सरपंच, वेळापूर

---

भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे पालखीचा मुक्काम असतो. भंडीशेगाव व वाखरीजवळ गोल रिंगण होते. हा सोहळा गतवर्षी पाहायला मिळाला नाही. कोरोनाचे रुग्णांचे प्रमाण कमी झाले तर आषाढी यात्रेचा सोहळा मोजक्या भाविकांत होण्यास काही हरकत नाही.

- मनीषा यलमार, सरपंच, भंडीशेगाव.

----

कमी लोकांमध्ये का होईना सोहळा व्हावा

गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते; परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे सोशल अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यासह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यावी. पालखी सोहळे गावापासून दोन ते तीन किलोमीटर थांबले तरी गर्दी होणार नाही, अशा भावना पंढपूरच्या आंबेकर-आजरेकर फडाचे मठाधीपती ह.भ.प. भागवत महाराज चवरे यांनी व्यक्त केल्या.

----

मानाच्या पालख्यांना पायी यात्रा करु द्या!

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. तो जतन करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. आषाढी यात्रेनिमित्त मानाच्या सात पालख्यांना मोजक्या संख्येत पायी यात्रा करू द्यावा, अशी मागणी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर महाराजांनी केली आहे.

----