शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जमीन आमची गेली मात्र पाणी ठरले आहे मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. ...

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. तेव्हा उजनीचे धरण साकारले. उजनी धरणातील पाणी प्राधान्याने करमाळा तालुक्यास मिळायला हवे. पण उजनीचे पाणी करमाळ्यास मृगजळच ठरले आहे. धरणातील पाणी मराठवाडयाला जातेय. आता इंदापूरला नेण्याचा घाट घातलाय पण धरण निर्मितीसाठी त्याग केलेला करमाळा तालुका अद्याप तहानलेलाच आहे.

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला सांडपाण्याच्या नावाखाली पळवण्याचा घाट घातला गेला असून, तसा प्रशासकीय आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. उजनीचे धरण स्व. नामदेवराव जगताप यांच्या मागणीवरून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी करमाळा तालुक्याच्या सीमेवर बांधले. धरण निर्मितीसाठी सर्वात मोठा त्याग करमाळा तालुक्याचा आहे. प्राधान्यक्रमाने करमाळा तालुक्यास या उजनी धरणातील पाण्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग वगळता तालुक्यातील संपूर्ण ७५ टक्के भाग धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे.

-----

धरण उशाला कोरड घशाला..

उजनी धरणातील पाणी दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्याला चाललेय पण हाकेच्या अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्याच्या नशिबी उजनीचे पाणी अद्याप नाही. करमाळा तालुक्याच्या उशाला उजनीचे धरण असताना येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनी धरणातून १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी देणारी दहिगाव उपसा सिंचन योजना अर्धवट आहे. धरणापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला वडशिवणे तलाव कोरडा ठणठणीत आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कागदावर आहे.

२७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या कुकडी प्रकल्पाचे पाणी प्रत्येक वर्षी आंदोलनाशिवाय मिळतच नाही. कालव्यातून पाणी मिळत असल्याने ‘टेल टू हेड’ चा नियम पाळला जात नाही. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळयात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ज्या तालुक्याने उजनीसाठी त्याग केला त्या करमाळा तालुक्यातील शेती व पिण्यास प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंवतराव जगताप, दिग्विजय बागल या नेते मंडळीसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

-----