शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जमीन आमची गेली मात्र पाणी ठरले आहे मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. ...

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. तेव्हा उजनीचे धरण साकारले. उजनी धरणातील पाणी प्राधान्याने करमाळा तालुक्यास मिळायला हवे. पण उजनीचे पाणी करमाळ्यास मृगजळच ठरले आहे. धरणातील पाणी मराठवाडयाला जातेय. आता इंदापूरला नेण्याचा घाट घातलाय पण धरण निर्मितीसाठी त्याग केलेला करमाळा तालुका अद्याप तहानलेलाच आहे.

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला सांडपाण्याच्या नावाखाली पळवण्याचा घाट घातला गेला असून, तसा प्रशासकीय आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. उजनीचे धरण स्व. नामदेवराव जगताप यांच्या मागणीवरून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी करमाळा तालुक्याच्या सीमेवर बांधले. धरण निर्मितीसाठी सर्वात मोठा त्याग करमाळा तालुक्याचा आहे. प्राधान्यक्रमाने करमाळा तालुक्यास या उजनी धरणातील पाण्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग वगळता तालुक्यातील संपूर्ण ७५ टक्के भाग धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे.

-----

धरण उशाला कोरड घशाला..

उजनी धरणातील पाणी दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्याला चाललेय पण हाकेच्या अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्याच्या नशिबी उजनीचे पाणी अद्याप नाही. करमाळा तालुक्याच्या उशाला उजनीचे धरण असताना येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनी धरणातून १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी देणारी दहिगाव उपसा सिंचन योजना अर्धवट आहे. धरणापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला वडशिवणे तलाव कोरडा ठणठणीत आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कागदावर आहे.

२७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या कुकडी प्रकल्पाचे पाणी प्रत्येक वर्षी आंदोलनाशिवाय मिळतच नाही. कालव्यातून पाणी मिळत असल्याने ‘टेल टू हेड’ चा नियम पाळला जात नाही. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळयात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ज्या तालुक्याने उजनीसाठी त्याग केला त्या करमाळा तालुक्यातील शेती व पिण्यास प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंवतराव जगताप, दिग्विजय बागल या नेते मंडळीसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

-----