शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

जमीन आमची गेली मात्र पाणी ठरले आहे मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. ...

करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. तेव्हा उजनीचे धरण साकारले. उजनी धरणातील पाणी प्राधान्याने करमाळा तालुक्यास मिळायला हवे. पण उजनीचे पाणी करमाळ्यास मृगजळच ठरले आहे. धरणातील पाणी मराठवाडयाला जातेय. आता इंदापूरला नेण्याचा घाट घातलाय पण धरण निर्मितीसाठी त्याग केलेला करमाळा तालुका अद्याप तहानलेलाच आहे.

उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला सांडपाण्याच्या नावाखाली पळवण्याचा घाट घातला गेला असून, तसा प्रशासकीय आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. उजनीचे धरण स्व. नामदेवराव जगताप यांच्या मागणीवरून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी करमाळा तालुक्याच्या सीमेवर बांधले. धरण निर्मितीसाठी सर्वात मोठा त्याग करमाळा तालुक्याचा आहे. प्राधान्यक्रमाने करमाळा तालुक्यास या उजनी धरणातील पाण्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग वगळता तालुक्यातील संपूर्ण ७५ टक्के भाग धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे.

-----

धरण उशाला कोरड घशाला..

उजनी धरणातील पाणी दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्याला चाललेय पण हाकेच्या अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्याच्या नशिबी उजनीचे पाणी अद्याप नाही. करमाळा तालुक्याच्या उशाला उजनीचे धरण असताना येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनी धरणातून १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी देणारी दहिगाव उपसा सिंचन योजना अर्धवट आहे. धरणापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला वडशिवणे तलाव कोरडा ठणठणीत आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कागदावर आहे.

२७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या कुकडी प्रकल्पाचे पाणी प्रत्येक वर्षी आंदोलनाशिवाय मिळतच नाही. कालव्यातून पाणी मिळत असल्याने ‘टेल टू हेड’ चा नियम पाळला जात नाही. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळयात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ज्या तालुक्याने उजनीसाठी त्याग केला त्या करमाळा तालुक्यातील शेती व पिण्यास प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंवतराव जगताप, दिग्विजय बागल या नेते मंडळीसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

-----