शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेशजिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सांगोला : ...

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेशजिल्ह्याला स्वतंत्र डाळिंब विभाग सुरू करण्यासाठी

कृषी मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

सांगोला : सोलापूर जिल्ह्याला कृषी विभागांतर्गत स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी किसान आर्मी वॉटर आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेत त्यांनी जिल्हास्तरावरुन प्रस्ताव पाठवून देण्याचे आदेश दिल्यानी माहिती कदम यांनी दिली.

सांगोला तालुक्यासाठी तब्बल २ लाख १३ हजार ७७४.४ क्षेत्रावर डाळिंब असल्याने लागवड आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याने डाळिंबाबाबत प्रशासन अधिक गतिमान व परिणामकारक होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना व्यापक व जलद मदत होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागांतर्गत स्वतंत्र अधिकारी कर्मचारी नियुक्त डाळिंब विभाग सुरू करावे, अशी मागणी प्रफुल्ल कदम यांनी कृषिमंत्री यांच्याकडे केली होती.

त्यावर कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मागणीचे महत्व व गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हास्तराला दिल्याचे कदम यांनी सांगितले

डाळिंब क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर लागवड कार्यक्रमाच्या सोबत विस्तार, प्रबोधन, प्रशिक्षण, विक्री व्यवस्थापन, पीक विमा, संशोधन आदी अनेक बाबींची जोड त्याला देणे गरजेचे आहे. कृषी विभागांतर्गत इतर अनेक योजना व अनेक कार्यक्रम असल्याने डाळिंब क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारा प्रशासकीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू शकत नाही.

सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्षेत्रात शेतकरी प्रचंड कष्ट करीत आहेत त्यामध्ये त्यांना प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे. तथापि कृषी विभागाचा हा सहभाग उद्दिष्ट केंद्रित, बाजार केंद्रित व गतिमान आणि व्यापक असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने डाळिंब क्षेत्रातील प्रगतीशी निगडित विविध घटकांमध्ये समन्वय, सुसूत्रता व प्रभावी अंमलबजावणी असणे आज अत्यंत निकडीचे आहे, त्याचबरोबर या क्षेत्राशी निगडित वेळोवेळी येणाऱ्या अडचणी प्रशासकीय पातळीवर तात्काळ व एकत्रितरीत्या सोडवणेही महत्त्वाचे असल्याचे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे.