शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे ...

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. भाजपने शेतकऱ्यांविषयी खोटी तळमळ दाखवली नाही आणि दाखवणारही नाही. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. यामुळे शेतकरी आपला कोणताही माल कुठेही विकू शकणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी शुक्रवारी तेरामैल येथील कृष्णा पॅलेस सांस्कृतिक भवन येथे भाजपकडून ’शेतकरी शिवार संसद’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. देशमुख बोलत होते. प्रारंभी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून केलेले भाषण यावेळी कार्यालयात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले.

यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आले त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा कृषी कायदा पंतप्रधानांनी काढला. हमीभाव, करार, कंत्राटी शेती, शेती करार अशा अनेक बाबींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यात सुलभता आणून दिली. शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे होणारे नुकसान रोखले जावे, हा एकच उद्देश ठेवून हा कायदा करण्यात आला आहे; मात्र दुर्दैवाने आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना भडकविण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नवा कृषी कायदा व अन्य बाबींची माहिती घ्यावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण आणि भाजप कायम कटिबद्ध असल्याचे आ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या शेतकरी मेळाव्याला दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, सचिन पाटील, संगप्पा केरके, गौरीशंकर मेनकुदळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

----

फोटो : २५ दक्षिण मेळावा

शेतकरी मेळाव्याचे दीप प्रज्वलनाने उद्‌घाटन करताना आमदार सुभाष देशमुख, हणमंत कुलकर्णी, प्रा. एम. डी. कमळे.