शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे ...

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. भाजपने शेतकऱ्यांविषयी खोटी तळमळ दाखवली नाही आणि दाखवणारही नाही. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. यामुळे शेतकरी आपला कोणताही माल कुठेही विकू शकणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी शुक्रवारी तेरामैल येथील कृष्णा पॅलेस सांस्कृतिक भवन येथे भाजपकडून ’शेतकरी शिवार संसद’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. देशमुख बोलत होते. प्रारंभी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून केलेले भाषण यावेळी कार्यालयात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले.

यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आले त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा कृषी कायदा पंतप्रधानांनी काढला. हमीभाव, करार, कंत्राटी शेती, शेती करार अशा अनेक बाबींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यात सुलभता आणून दिली. शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे होणारे नुकसान रोखले जावे, हा एकच उद्देश ठेवून हा कायदा करण्यात आला आहे; मात्र दुर्दैवाने आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना भडकविण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नवा कृषी कायदा व अन्य बाबींची माहिती घ्यावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण आणि भाजप कायम कटिबद्ध असल्याचे आ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या शेतकरी मेळाव्याला दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, सचिन पाटील, संगप्पा केरके, गौरीशंकर मेनकुदळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

----

फोटो : २५ दक्षिण मेळावा

शेतकरी मेळाव्याचे दीप प्रज्वलनाने उद्‌घाटन करताना आमदार सुभाष देशमुख, हणमंत कुलकर्णी, प्रा. एम. डी. कमळे.